महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंधश्रद्धेची शिकार बनलेल्या महिलेची १२ वर्षानंतर सुटका

आंबेगाव तालुक्यातील पेठ येथे राहणाऱ्या पुष्पा पवळे यांच्या डोक्यावर 12 वर्षांपासून जटा आली होती. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या पुष्पा यांना या त्रासांतून मुक्त केले.

By

Published : Jul 8, 2019, 11:58 AM IST

महिलेच्या डोक्यावरील जटा काढताना नंदिनी जाधव

पुणे - गेल्या 12 वर्षांपासून अंधश्रद्धेच्या शिकार बनलेल्या एका महिलेची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने सुटका केली आहे. पुष्पा धोंडीभाऊ पवळे या महिलेच्या डोक्यावर जटा आल्या होत्या. त्यामुळे त्यांना शारीरिक, मानसिक आजाराचा त्रास होत होता. यातून अंनिसच्या कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी पुष्पा यांची सुटका केली आहे.

महिलेच्या डोक्यावरील जटा काढताना नंदिनी जाधव
आंबेगाव तालुक्यातील पेठ येथे राहणाऱ्या पुष्पा पवळे यांच्या डोक्यावर 12 वर्षांपासून जटा आली होती. सौदत्ती (कर्नाटक)देवीला गेल्यास तुमची जटा आपोआप गळून पडेल असा सल्ला त्यांना देण्यात आला होता. भोळ्या आशेने त्या 10 हजार रुपये खर्च करुन सौदत्तीला गेल्या. पण तरीही त्यांची जटा सुटली किंवा गळून पडली नाही. त्यांची जटा वाढतच गेली. यामुळे त्यांचा मानसिक आणिशारीरिक आजारासहवाढतच गेला.
अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या नंदिनी जाधव यांना पुष्पा यांच्या बद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पुष्पा यांचे घर गाठले आणि त्यांच्या कुटुंबीयांना विश्वासात घेतले. डोक्यातील केसांवर जटा ही केवळ अंधश्रद्धा असल्याचे त्यांनी पुष्पा यांना पटवून दिले आणि त्यांच्या डोक्यावरील जटा कापून काढल्या. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीमार्फत आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील 114 महिलांना डोक्यावर आलेल्या जटांच्या त्रासांतून मुक्त करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details