पुणे -शिरुर तालुक्यातील वाघाळे येथे चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात रात्रीच्या सुमारास चारचाकी गाडी पडून काका-पुतण्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बापू बाळू रासकर (वय 35) आणि लक्ष्मण भानुदास रासकर (वय 35), अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही आण्णापूर येथील रहिवासी होते.
चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात कार पडून काका-पुतण्याचा मृत्यू - बापू बाळू रासकर
काल(14 जानेवारी) सकाळी चासकमानच्या डाव्या कालव्यात चारशे क्युसेस वेगाने पाणी आले आहे. लक्ष्मण व बापु हे दोघे रात्रीच्या वेळी कारमधून जात असताना अंदाज न आल्याने गाडी अचानक कालव्यात पडली. दरम्यान, कालव्यातील पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने दोघांनाही गाडीच्या बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.

मृत बापू बाळू रासकर आणि लक्ष्मण भानुदास रासकर
चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात कार पडून काका-पुतण्याचा मृत्यू
हेही वाचा -तिसऱ्या मजल्यावरून पडून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू, दोन्ही किडन्या झाल्या होत्या निकामी
काल(14 जानेवारी) सकाळी चासकमानच्या डाव्या कालव्यात चारशे क्युसेस वेगाने पाणी आले आहे. लक्ष्मण व बापु हे दोघे रात्रीच्या वेळी कारमधून जात असताना अंदाज न आल्याने गाडी अचानक कालव्यात पडली. दरम्यान, कालव्यातील पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने दोघांनाही गाडीच्या बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. वाघाळे परिसरात काका-पुतण्याच्या मृत्युमुळे शोककळा पसरली आहे.
Last Updated : Jan 15, 2020, 11:48 AM IST