पुणे - पंतप्रधानांनी काशीमधील घाट स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे. वैचारिक मतभेद असले तरी त्यांनी घेतलेला निर्णय चांगला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. आज इंद्रायणी शुद्धीकरणाची मागणी करण्यात आली आहे. इंद्रायणी स्वच्छ करण्याची जबाबदारी माझी असल्याचे पवार यावेळी म्हणाले.
आळंदीत सदगुरु जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सव सुरु आहे, या क्रार्यक्रमात शरद पवार बोलत होते. जो वर्ग समाजाच्या हितासाठी मागणी करतो, त्याच्या मागे सरकार उभे नाही राहिले तर असे सरकार काय कामाचे? त्यामुळे याची पूर्तता ही नक्कीच होईल. हे आश्वासन नाही तर हे कर्तव्य आहे. ही पूर्तता करण्याची जबाबदारी माझी असल्याचे पवार म्हणाले.