महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांसोबतच वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज - dnyaneshwar palkhi

संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यातील भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी असते. तर संत तुकारामांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असते. या दोन्ही पालख्या विसावा घेणार असलेल्या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे.

वारी

By

Published : Jun 25, 2019, 5:03 PM IST

पुणे- संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायांचे श्रद्धास्थान असणाऱ्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखींचे बुधवारी सायंकाळी पुण्यात आगमन होणार आहे. या पालख्यासोबतच लाखोच्या संख्येने वारकरी पुणे शहरात येत असतात. त्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे.

वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज

संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यातील भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी असते. तर संत तुकारामांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असते. या दोन्ही पालख्या विसावा घेणार असलेल्या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. पालखी शहरात मुक्कामी असताना दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. येथे होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाच्या वतीने या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी संशयितावर सीसीटीव्ही कॅमेऱयाद्वारे लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पुणे महानगरपालिकेच्यावतीने देखील पालखी आणि वारकऱ्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली. रस्त्याची डागडुजी, साफसफाई, वीज, पाणीपुरवठा अधिक कामे मार्गी लावली आहे. शिवाय शहराच्या प्रवेशद्वारावर महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त सौरभ राव यांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यासाठी मंडपही उभारला असून ध्वनिक्षेपकाची व्यवस्था केली आहे.

महापौर मुक्ता टिळक यांनी स्वतः पालखी मार्गाची तसेच वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना साफसफाई बद्दल आणि इतर सूचना केल्या. पालखीचे आगमन लक्षात घेऊन वारकऱ्यांना पाणी कमी पडू नये यासाठी महापालिकेने शहरात दोन दिवस २४ तास पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details