महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Protest of NCP : राज्यपालांच्या वक्तव्यांविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन - against Governors remarks

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या वक्तव्यां विरोधात (against Governors remarks), आज पुण्यामधील अलका टॉकीज चौकात आंदोलन (NCP protests) करण्यात आले. हे आंदोलन मराठी माणसासाठी, मुंबईसाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी असल्याचे (National Congress Party) राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले.

Movement of Nationalist Congress Party
राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

By

Published : Jul 30, 2022, 5:05 PM IST

पुणे: महाराष्ट्रातुन गुजराती, राजस्थानी लोक निघून गेलेत; तर महाराष्ट्रात काहीही उरणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केले होते. याविरोधात (against Governors remarks) आज पुणे येथे आंदोलन (NCP protests) करण्यात आले. पुण्यामधील अलका टॉकीज चौकात राष्ट्रवादीच्या (National Congress Party) वतीने आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन मराठी माणसासाठी, मुंबईसाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले.

आंदोलना दरम्यान प्रतिक्रीया व्यक्त करतांना रूपाली पाटील


राज्यपालांना आपल्या पदाची लाज नाही, किंमत नाही, ते काय बोलतात, ते त्यांनाच कळत नाही. त्यामुळे मराठी अस्मिते वरती घाला घालायचा, हा प्रकार आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची ही चाल आहे. हे राज्यपाल नाही तर भाजपच बोलतेय. त्यामुळे राज्यपालांना राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी परत पाठवावे. अशी आमची मागणी आहे, असे रूपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले.


राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे ते असे वक्तव्य करतात. वारंवार राज्यपालांकडून महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान होतो. त्यामुळे देशाच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी, राज्यपालांना परत बोलवावे. महाराष्ट्राच्या इतिहासात असे राज्यपाल कधीच बघितले नाही. या राज्यपाल यांना महाराष्ट्राचा अभिमान नाही. त्यांनी या पदावर राहू नये. अशी आमची मागणी आहे.


भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडवणीस यांना राज्यपालांची ही भूमिका मान्य आहे का? आणि भाजपाला देखील मान्य आहे का? हे सुद्धा देवेंद्र फडवणीस यांनी स्पष्ट करावे. महाराष्ट्र, गुजरात, मराठी असा वाद निर्माण करायचा आहे? याची स्पष्ट भूमिका भाजपाने जनतेसमोर मांडली पाहिजे, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

हेही वाचा :MP Balu Dhanorkar : महाराष्ट्राला कमी लेखण्याचे काम त्यांनी करू नये; मावळा पेटून उठला तर... खा. बाळू धानोरकर

ABOUT THE AUTHOR

...view details