बारामती : सर्वपक्षीय आघाडीमुळे यंदाची मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक (Mumbai Cricket Association Election) राज्यभर गाजली. क्रिकेटर संदीप पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजप नेते आशिष शेलार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर या नेतेमंडळींनी ताकद लावली होती. त्यामुळे क्रिकेटमधील राजकीय हितसंबंधांवरून (reaction on politics in cricket) टीका केली जात असून या टीकेला शरद पवारयांनी उत्तर दिलं (NCP President Sharad Pawar reaction) आहे.
राजकारण करणाऱ्यांचे अज्ञान :जे लोक राजकारण करत आहेत त्यांचे ते अज्ञान आहे. काही ठिकाणं अशी असतात, जिथे राजकारण आणायचे नसते. जेव्हा मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो. त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे प्रतिनिधी होते. ते माझ्या बैठकांना हजर असत. दिल्लीचे अरूण जेटली होते, अनुराग ठाकूर हे हिमाचलचे अध्यक्ष होते. मी देशाचा अध्यक्ष आणि बाकी राज्याचे अध्यक्ष आम्ही एकत्र काम केलं आहे. आमच्या लोकांचे काम हे खेळाडूंना सुविधा देण्याचे आहे, बाकी गोष्टीत आम्ही लक्ष देत नाही, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले (Sharad Pawar reaction on politics in cricket) आहे.