मुंबई - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सुधा भारद्वाज, अरुण फेरेरा, व्हेरनॉन गोन्सालविन्स यांचा जामीन नाकारला आहे. उच्च न्यायलयाने जामिनाबाबतच्या सर्व याचिका नामंजूर केल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयामध्ये मागील एक महिन्यापासून याप्रकरणी सुनावणी सुरू होती. न्यायमूर्ती सारंग कोतवळ यांनी याचिकेवर निर्णय दिला. न्यायालयाने ७ ऑक्टोबर पासून याचिकांवरील निर्णय राखून ठेवला होता.
डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद आयोजित केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. एल्गार परिषदेमुळे कोरेगाव भीमामध्ये हिसांचार उफाळून आला, असा आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे.
या तिघांना बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय दंड विधानच्या विविध कलमांखाली अटक करण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यात पुणे जिल्हा न्यायालयाच्या विशेष न्यायाधिशांनी तिघांना जामीन नाकारला होता. जामीन नाकारल्यानंतर तिघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.