पुणे : यावेळी त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत फोन केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची मागणी ही सकारात्मक असून आम्ही आजच्या कॅबिनेटमध्ये सकारात्मक निर्णय घेऊ, असे यावेळी फोनद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना सांगितले आहे. यावेळी जोपर्यंत निर्णय मान्य होत नाही, तोपर्यंत अमाही आंदोलन थांबवणार नाही, असे देखील यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांना फोनवरून दिलासा दिला.
निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नाही :आम्ही विद्यार्थी मागील अनेक वर्षांपासून राज्यसेवा परीक्षेची तयारी करीत आहोत. पण अचानक आयोगाकडून आदेश काढला जातो की, 2023 पासून तुमच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे. हा निर्णय आम्हाला मान्य नाही. आयोगाने 2025 मध्ये तो नियम लागू करावा, अशी आमची राज्य सरकारकडे मागणी आहे. राज्य सरकार अनेक निवडणुका पुढे घेत जात आहे. त्यामुळे आमचा अभ्यासक्रमाचा निर्णय 2025 पासून लागु करण्याचा निर्णय राज्य सरकारला सहज शक्य आहे. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांचा विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी या विद्यार्थ्यांच्या वतीने अलका चौक येथे हे तिसरे आंदोलन आहे.
विद्यार्थ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला :राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा, या मागणीसाठी सातत्याने विद्यार्थ्यांच्या वतीने याआधी आंदोलने करण्यात आली. पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. अनेक वर्ष विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करतात. मात्र, 2023 मध्ये अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. याआधी तब्बल 18 तासाचे आंदोलन करण्यात आले होते. आज देखील निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.या आंदोलनात भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अभिमन्यू पवार, सदाभाऊ खोत हे उपस्थित झाले आहेत.
14 जानेवारीचे आंदोलन : या आंदोलनात मध्यरात्री दोन वाजल्याच्या सुमारास म्हाडा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यांच्या मागण्या उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर देखील हे आंदोलन सुरू होते. त्यानंतर 5 जणांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट होणार असल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले होते. या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हेही वाचा: Illegal Hoarding in Mumbai : मुंबईत धार्मिक, राजकीय बॅनरबाजी; पालिकेची १६ हजार ३६० फलकांवर कारवाई