दौंड (पुणे) -केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार जयकुमार गोरे यांनी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली. तसेच, कुल यांनी काही मागण्या यावेळी केल्या.
...या आहेत मागण्या
१. कोयना व टाटा धरणांद्वारे जलविद्युत वीजनिर्मितीसाठी कृष्णा खोऱ्यातील पूर्वमुखी पाणी पश्चिमेकडे वळविण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना जलविद्युत वीजनिर्मितीसाठी पूर्वेकडे कृष्णा, भीमा खोऱ्यातील पाणी अरबी समुद्राकडे नेले जात आहे. वास्तिवक पाहता या पाण्यावर पहिला हक्क असणाऱ्या कृष्णा, भीमा खोऱ्यातील नागरिकांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. ही बाब आमदार कुल यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली.