पुणे- मराठा समाजाला दिलेले ईडब्लूएसचे आरक्षण हे ऐच्छिक आहे, ज्यांची इच्छा असेल ते घेतील, मात्र ईडब्लूएस चा परिणाम ईसीबीसीच्या सर्वोच्च न्यायालयातील खटल्यावर होणार नाही. तज्ज्ञांशी चर्चा करूनच निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे विधीज्ञ सांगत आहेत, याचा परिणाम इसीबीसी संदर्भात न्यायालयातील प्रकरणावर होणार नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे पुनर्वसन आणि ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. ते पुण्यात बोलत होते.
पुण्यात ओबीसी व्हिजेएनटी जनमोर्चाकडून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी विजय वडेट्टीवार यांच्या सोबत संवाद बैठकीचे आयोजन केले होते. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागण्याचा प्रश्नच नाही, आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि मुख्यमंत्र्यांनीही आधीच स्पष्ट केले आहे. कोणालाही ओबीसीच्या आरक्षणातून वाटा देणार नाही, मी ओबीसी नेता म्हणून माझी भूमिका स्पष्ट आहे. ओबीसीमध्ये कुणाचाही समावेश होता कामा नये. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, हीच भूमिका आहे.