महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नारायणगावाजवळ मीना नदीवरील पूल पाण्याखाली; गावांना सतर्कतेचा इशारा - जुन्नर तालुका

गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. आज (दि.२७ जुलै) दुपारनंतर नारायणगावातून वाहणाऱ्या मीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली. यामुळे नारायणगाव व वारूळवाडीला जोडणारा मुख्य पूल पाण्याखाली गेला आहे.

नारायणगाव व वारूळवाडीला जोडणारा मुख्य पुल पाण्याखाली गेला आहे.

By

Published : Jul 27, 2019, 11:35 PM IST

पुणे - गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. आज (दि.२७ जुलै) दुपारनंतर नारायणगावातून वाहणाऱ्या मीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली. यामुळे नारायणगाव व वारूळवाडीला जोडणारा मुख्य पूल पाण्याखाली गेला आहे.

नारायणगाव व वारूळवाडीला जोडणारा मुख्य पूल पाण्याखाली गेला आहे.
दोन दिवसांपासून जुन्नर तालुक्यात पावसाचा जोर कायम असून, नद्यांच्या पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीतील पाणी पुलावरून जात असल्याने पुलावरील वाहतूक बंद केली आहे.

पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास नदीपात्रातील पाणी बाहेर येण्याची शक्यता असून, पात्रानजिक असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details