राजगुरुनगर (पुणे) -बाजार समिती व त्यातील दलालांमुळे महागाई वाढत असल्याचा ठपका ठेवतकेंद्र सरकारने शेतमालाला कोठेही विक्रीसाठी मुभा दिली आहे. यामुळे बाजार समित्या धोक्यात आल्या असून याबाबत राज्यातील बाजार समित्यांनी शुक्रवारी (21 ऑगस्ट) एक दिवसीय लक्षणीय संप करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर होणारच, तसेच अनेकांचा रोजगार जाण्याची शक्यता आहे असे महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे अध्यक्ष दिलीप मोहिते-पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
केंद्राच्या निर्णयाला बाजार समिती महासंघाचा विरोध; पुकारला राज्यव्यापी संप - महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ
बाजार समिती व त्यातील दलालांमुळे महागाई वाढत असल्याचा ठपका ठेवत केंद्र सरकारने शेतमालाला कोठेही विक्रीसाठी मुभा दिली आहे. यामुळे बाजार समित्या धोक्यात आल्या असून याबाबत राज्यातील बाजार समित्यांनी एक दिवसीय लक्षणीय संप करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिलीप मोहिते-पाटील
महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे अध्यक्षांशी बोलताना प्रतिनिधी
Last Updated : Aug 20, 2020, 8:39 PM IST