महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोणावळ्यातील भुशी धरणावर पर्यटकांची गर्दी; अजित पवारांच्या आवाहनाला केराची टोपली

निर्बंध झुगारून पर्यटनस्थळावर गर्दी करू नका, त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढत आहे. असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील नागरिकांना केले होते. परंतु, त्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत लोणावळा येथील भुशी धरणावर पर्यटकांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे.

By

Published : Jul 11, 2021, 5:20 PM IST

Updated : Jul 11, 2021, 5:36 PM IST

lonavla crowd of tourists on bhushi dam
lonavla crowd of tourists on bhushi dam

लोणावळा (पुणे) - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी पर्यटनस्थळी नियमांचे उल्लंघन करून येऊ नये, असे आवाहन केले होते. परंतु, त्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत आज भुशी धरणावर पर्यटकांची गर्दी झाल्याचे निदर्शनास आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळी नागरिकांना बंदी आहे. परंतु, त्यांचे उल्लंघन करून शनिवार आणि रविवार विकेंडचा दिवस असल्याने पुणे जिल्ह्यातून लोणावळा परिसरात हजारो पर्यटक दाखल होतात. डॅमवर मोठ्या संख्येने पर्यटक पाहायला मिळाले असून त्यांनी भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसून पाण्यात भिजण्याचा आनंद घेतला. लोणावळ्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते. लोणावळा शहराचे आकर्षण असलेल्या भुशी धरणावर भिजण्यासाठी एकच झुंबड उडत आहे. लोणावळा शहर पोलिसांचा बंदोबस्त जागोजागी पाहायला मिळत असून पर्यटक पोलिसांची नजर चुकवून जात असल्याचे समोर आले आहे.

लोणावळ्यातील भुशी धरणावर पर्यटकांची गर्दी

पुणे, मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे हौसी पर्यटक येतात. परंतु, त्यांनी कोविडचे नियम धुडकावून लोणावळा येथील पर्यटनस्थळी येऊ नये, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले आहे. दरम्यान, भुशी धरणावर आलेल्या पर्यटकांना पोलिसांनी हुसकावून लावले आहे.

दरम्यान, एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारंवार पर्यटकांनी पर्यस्थळी गर्दी करू नका आणि शासनाच्या नियमांच पालन करावं असं आवाहन करत असताना, दुसरीकडे त्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत, नियम डावलून पर्यटक गर्दी करताना दिसत आहे.

नियम डावलून राज्यातील अनेक पर्यटनस्थळावर नागरिकांची गर्दी -

पावसाळ्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेला लोणावळ्यातील भुशी डॅम ओवरफ्लो झाला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होताच धरण परिसरात पर्यटकांची गर्दी असते. मात्र यावर्षी सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस प्रशासनाकडून धरणारकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.

त्याचबरोबर नवी मुंबईतील पारसिक हिल भागात अनेक जवळपासच्या पर्यटकांनी गर्दी केली आहे. मुंबईकरांची पाऊलेही लोणावळ्याच्या दिशेनं आणि पुण्यानजीक असणाऱ्या डोंगरमाथ्यांच्या दिशेनं वळली आहेत. येथील लायन्स पॉईंट, टायगर पॉईंटवर अनेक पर्यटकांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे.

कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक आंबोली, सावंतवाडी व गोकाकचा धबधबा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पर्यटक राधानगरी धरण, राऊतवाडी धबधबा, शाहुवाडीतील बरकी धबधबा, आंबा घाट, करुळ घाट, दंडोबा डोंगर, गिरीलिंग डोंगर, महाबळेश्वर, पाचगणी, कासपठार, कास तळास, ठोसेघर धबधबा येथे गर्दी करत आहेत.

मराठवाड्यातील पर्यटक सौताडा, भंडारदरा, चिखलदरा येथे जात आहेत.

Last Updated : Jul 11, 2021, 5:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details