बारामती - राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसमवेत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी योग्य उपाययोजना संदर्भात चर्चा होणार आहे. व या चर्चेनंतर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते बारामतीमध्ये बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. त्यांनी बारामतीतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी बारामतीमध्ये वाढत असलेल्या कोरोनाबाधितांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान बारामतीत वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जे निर्णय घेण्यात आले आहेत, त्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा नाही