पुणे -कोथरूड येथे खून झालेल्या एका १६ वर्षीय मुलाच्या सांगाड्यावर (हाडांचा सापळा) तब्बल १७ वर्षानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. सांगड्यावर अंत्यसंस्कार करायला इतका विलंब झाल्यामुळे समाजाच्या विविध स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, उशिरा का होईना त्याच्यावर अंत्यसंस्कार झाल्याने त्याला मुक्ती मिळाल्याची भावना देखील काही जण व्यक्त करत आहे. निखिल रणपिसे, असे अंत्यविधी करण्यात आलेल्या अल्पवयीने मुलाचे नाव आहे.
यासंदर्भात कोथरुडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2002 साली एमआयटी कॉलेजजवळ निखिल रणपिसे (वय.१६) याचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा मृतदेह न्यायवैद्यक तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. तपासणीनंतर त्याचा सांगाडा कोथरूड पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात ठेवण्यात आला होता.