महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मत मागायची गरज नाही तर मोदी आणि देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रभर का फिरत आहे- शरद पवार - Sharad Pawar Ajit Pawar public Meeting News

महाराष्ट्राची जनता ही काही साधीसुधी जनता नाही. या जनतेने विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, विधान परिषदेवर ५२ वर्ष  मला निवडून दिले आहे. काहीतरी काम केले आहे म्हणूनच जनतेने मला ५२ वर्ष निवडून दिले आहे. तुम्हाला पाच वर्षांपूर्वी कोणी ओळखत नव्हते आणि तुम्ही मला विचारत आहे की पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले, असे म्हणत अमित शहा यांचा पवारांनी खरपूस समाचार घेतला.

शरद पवार

By

Published : Oct 19, 2019, 10:12 PM IST

पुणे- भाजपवाले म्हणतात मते मागायला जायचीसुद्धा आम्हाला आवश्यकता नाही. मग पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रभर कशासाठी फिरत आहे. असा प्रश्न विचारत ज्यांना पाच वर्षांपूर्वी कोणी ओळखतही नव्हते ते आज आम्हाला विचारतात की पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले, असे म्हणत शरद पवार यांनी मोदी शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

सभेला संबोधन करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

बारामती येथील मिशन हायस्कूल मैदानावर अजित पवार याची प्रचार सभा होती. त्यात बोलताना त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राची जनता ही काही साधीसुधी जनता नाही. या जनतेने विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, विधान परिषदेवर ५२ वर्ष मला निवडून दिले आहे. काहीतरी काम केले आहे म्हणूनच जनतेने मला ५२ वर्ष निवडून दिले आहे. तुम्हाला पाच वर्षांपूर्वी कोणी ओळखत नव्हते आणि तुम्ही मला विचारता आहे की पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले, असे म्हणत अमित शहा यांचा पवारांनी खरपूस समाचार घेतला.

पुढे बोलताना पवार म्हणाले की सरकार समाजातील लहान घटक, कष्टकरी, शेतकऱ्यांसाठी वेगळी आणि मोठ्या लोकांसाठी वेगळी भूमिक घेत आहे. आपल्या हिताची जपणूक करणारे सरकार नाही. त्यामुळे त्यांना मते मागण्याचा अधिकार नाही. राज्यभर तरुणांचा मोठा प्रतिसाद असून ही निवडणूक तरुणांनी हाती घेतली असल्याचे सांगून उद्याच्या निवडणुकीत मतदान करताना सतत गैरवापर करणाऱ्यांना धडा शिकवा, असे पवार म्हणाले.

हेही वाचा-'राज्यासह पुण्यात काँग्रेसचे अस्तित्वच दिसत नाही'

अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्‍यांचा जल्‍लोष

राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यास केवळ काही तास शिल्लक आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी उन, पावसाची तमा न बगळता प्रचार सभांचा धडाकाच लावला आहे. आज विधानसभा प्रचाराचा शेवटचा दिवस त्यात बारामतीत दिवसभर धो-धो पाऊस पडला. मात्र तरीही कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू होती. 'एकच साहेब पवार साहेब', 'एकच वादा अजित दादा', अशी घोषणाबाजी करत पवार समर्थकांनी भर पावसात सभेला मोठी गर्दी केली होती.

या दडपशाही सरकारला आरे ला कारे म्हणणारे कोणी असेल तर ते पवार साहेब आहेत. अजित दादांना देशात सर्वाधिक मताधिक्याने म्हणजेच दीड लाख मतांनी निवडून द्या, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. तेव्हा उपस्थितांनी दोन लाख मतांनी निवडून आणू असा जोरदार आवाज दिला.

हेही वाचा-साताऱ्यातील शरद पवारांची सभा प्रत्येकाला अभिमान वाटेल अशी - अमोल कोल्हे

ABOUT THE AUTHOR

...view details