महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला, पाण्याचा विसर्ग कमी केला

रविवारपेक्षा गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. मात्र, नाशिक शहरामध्ये पावसाची संततधार सुरुच आहे.

By

Published : Aug 5, 2019, 12:19 PM IST

Updated : Aug 5, 2019, 3:14 PM IST

गोदावरी

नाशिक- नाशिकच्या गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. रविवारपेक्षा गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली असून पुराची तीव्रता कमी झाली आहे. मात्र, नाशिक शहरामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. रामकुंड येथील दुतोंड्या मारुतीची मूर्ती अजूनही पाण्यात बुडालेली आहे. तसेच रामसेतू पूल देखिल पाण्याखाली आहे. पावसाची संततधार जर अशीच सुरू राहिली तर पुन्हा एकदा गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढून नदीकाठच्या नागरिकांच्या समस्या वाढू शकतात.

गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला

पावसामुळे आज(सोमवारी) नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पूर भागात नियमांचे उल्लंघन केलेल्या 24 नागरिकांवर पोलिसांनी कलम 144 अंतर्गत कारवाई केली आहे. त्यामुळे पूर बघण्याची होणारी गर्दी कमी झाली आहे.

कुठल्या धरणांतून किती विसर्ग होतोय..

गंगापुर धरण 18909 क्युसेक
दारणा धरण 40342 क्युसेक
नांदुर मध्यमेश्वर धरण 269298
भावली धरण 2152 क्युसेक
आळंदी धरण 4500 क्युसेक
पालखेड धरण 46170 क्युसेक
चणकापूर धरण 11883 क्युसेक
हरणबारी धरण 5548 क्युसेक
पुणेगाव धरण 5673 क्युसेक
होळकर पुलाखालून 25833 क्युसेक

Last Updated : Aug 5, 2019, 3:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details