महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'लॉकडाऊन'मुळे फळ विक्री नाही; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - farmers lose their fruit crops due to lockdown

शेतकरी शेतात काबाड कष्ट करुन शेतात नवनवीन प्रयोग करुन शेती फुलवतो. यामध्ये शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा रहातो. यातून शेतकऱ्यांनी माळरानवर हिरव्यागार फळबागा फुलवल्या आहेत. मात्र, याच फळबागा दुष्काळ, अवकाळी पाऊसाच्या शिकार बनला होता. त्यातुनही शेतकरी कसाबसा सावरला. फळबागाही फुलल्या. मात्र, सध्या कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये बाजार समित्या बंद झाल्याने माल विकायचा कुठे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

फळबागांचे झाले नुकसान
फळबागांचे झाले नुकसान

By

Published : Apr 12, 2020, 6:30 PM IST

शिरुर (पुणे)- देशात कोरोनाचा संसर्ग जसा दिवसेंदिवस वाढत चालला आहे तसा शेतात काबाड कष्ट करणारा बळीराजा हतबल होत चालला आहे. राज्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यानंतर शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी शेतीमालासह फळबागांतील फळे जागेवर गळुन पडू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

'लॉकडाऊन'मुळे फळ विक्री नाही; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
शेतकरी शेतात काबाड कष्ट करुन शेतात नवनवीन प्रयोग करून शेती फुलवतो. यामध्ये शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा रहातो. यातून शेतकऱ्यांनी माळरानवर हिरव्यागार फळबागा फुलवल्या आहेत. मात्र, याच फळबागा दुष्काळ, अवकाळी पाऊसाच्या शिकार बनला होता. त्यातुनही शेतकरी कसाबसा सावरला. मात्र, सध्या कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये फळबागा फुलल्या मात्र बाजार समित्या बंद झाल्याने माल विकायचा कुठे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले त्यातच कोरोनाचा संसर्ग झापड्याने वाढत असताना आता ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम करण्यात आले आहे. शेतात तयार झालेला शेतमाल शेतातच कुजून चालला आहे. शेतकऱ्यांनी मोठा भांडवली खर्च, बँकेचे कर्ज, मजुरी हे सर्व शेतकऱ्यांच्या डोक्यावर बोजा वाढत आहे. खरीप हंगामात अवकाळी पाऊसाने उभ्या फळबागा आडव्या झाल्या त्यातुन सावरलेली फळबाग उभी राहिली आणि कोरोनाच्या लॉकडाऊनच्या संकटात सापडली आहे. देशावर आलेले संकट कष्टकरी बळीराजा आपल्या खांद्यावर घेऊन पुढे चालत आहे. याच संकटात कष्टातून उभारलेली शेती व फळबाग डोळ्यासमोर नष्ट होत आहे. सरकारने या शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे रहाण्याची गरज आहे. तरच हा बळीराजा पुन्हा उभा राहू शकेल, अशी शेतकरी वर्गाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details