पुणे -उजनी धरणाचे पाणी पुणे जिल्ह्यातील इंदापूरला देण्याला सोलापूरमधील शेतकऱ्यांचा विरोध आहे. या संदर्भात आज पुण्यात सोलापूरचे पालकमंत्री आणि जलसंपदा राज्यमंत्री असलेल्या दत्ता भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी बैठकीसाठी आलेले सोलापूरचे शेतकरी, तसेच इंदापूरचे शेतकरी हे पालकमंत्री भरणे यांच्या समोरच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
हेही वाचा -पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजगूनगरच्या शाखेस कोरोनाचा विसर
सोलापूर जिल्ह्यातील उजणी धरणाचे पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यावरून हा वाद आहे. उजनी धरणाचे 5 टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र याला सोलापूरच्या शेतकऱ्यांनी विरोध केला. जलसंपदा राज्यमंत्री असलेले दत्ता भरणे हे इंदापूरचे आमदार आहेत, तर सोलापूरचे पालकमंत्री आहेत. उजनीचे पाणी देण्यावरून सोलापूरच्या शेतकऱ्यांमध्ये जी नाराजी आहे, ती दूर करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती, मात्र बैठकीदरम्यानच दत्ता भरणे यांच्यासमोरच सोलापूर आणि इंदापूरच्या शेतकऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी पहायला मिळाली.
शेतकऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न