महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Deputy CM Devendra Fadnavis : पूरस्थितीची तुलना करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे - फडणवीस

पुण्यात अतिवृष्टीमुळे पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले Life disrupted due to heavy rain in mumbai आहे. पूरस्थितीवरून तोंडसुख घेणाऱ्या भाजपला नागरिकांनी नागपूर आणि पुणे शहराची तुलना करणारे ट्रेंड सुरू झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis यांनी असे ट्रेंड चालवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, संतप्त विधान करत ट्रेंडबाजांवर आगपाखड केली. तसेच दरवर्षी मुंबई पाण्यात घालणाऱ्यांना आता मुंबईकर कधीही मुंबई हातात देणार नाहीत, असे वक्तव्य करत पळवाट Comparison of Mumbai Nagpur flood situation काढली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. Devendra Fadnavis criticize trendsetters who Compare Mumbai and Nagpur flood situation

By

Published : Sep 12, 2022, 4:41 PM IST

Etv BharatDeputy CM Devendra Fadnavis
पूरस्थितीची तुलना करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे

मुंबई -पुण्यात अतिवृष्टीमुळे पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले Life disrupted due to heavy rain in mumbai आहे. पूरस्थितीवरून तोंडसुख घेणाऱ्या भाजपला नागरिकांनी नागपूर आणि पुणे शहराची तुलना करणारे ट्रेंड सुरू झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis यांनी असे ट्रेंड चालवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, संतप्त विधान करत ट्रेंडबाजांवर आगपाखड केली. तसेच दरवर्षी मुंबई पाण्यात घालणाऱ्यांना आता मुंबईकर कधीही मुंबई हातात देणार नाहीत, असे वक्तव्य करत पळवाट Comparison of Mumbai Nagpur flood situation काढली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पूरस्थितीची तुलना करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे
राज्यात पावसाची कोसळधार -राज्यात पावसाची कोसळधार सुरू आहे. पुण्यालाही पावसाने झोडपून काढले असून अनेक भागात पाणी साचले Waterlogged in many areas of Mumbai आहे. पावसाच्या पाण्यामुळे आलेल्या पुरात वाहने वाहून गेली आहेत. विरोधकांनी पुणे महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपवर सडकून टीका केली आहे. सोशल मीडियावर मुंबई आणि पुणे - नागपूर महापालिका यांची तुलना करत सत्ता कोणाला द्यायची असा सवाल ट्रेंडद्वारे उपस्थित होतो आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत छेडले असता, अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली. पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या पर्जन्यवाहिन्या छोटे असल्याने पाण्याचा निचरा झाला नाही. अनेक भागात यामुळे पाणी साचले आहे. सध्या पाण्याचा निचरा करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

लाज वाटली पाहिजे - ज्या प्रकारे ट्रेंड चालवला जातो आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे, असा संताप फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई त हजारो कोटी रुपये दरवर्षी खर्च होतात. पुणे नागपूर सारख्या शहरात एकाच वर्षी अशी परिस्थिती उद्भवली आहे. मुंबईत दरवर्षी कोट्यावधी खर्च करूनही, अशी अवस्था होते. मुंबईकर त्यांच्या हातात कधीही आता मुंबई देणार नाहीत असे फडणवीस म्हणाले. यंदा मुंबईत पाणी साचला नाही, असा प्रतिप्रश्न विचारला असता फडणवीस यांनी उत्तर देण्याचे टाळले.

ABOUT THE AUTHOR

...view details