महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Devendra Fadnavis On Bullock Cart Races : बैलगाडी शर्यतीचा निकाल म्हणजे शेतकऱ्यांचा विजय - फडणवीस - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतींना परवानगी दिली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र सरकारने बैलगाडी शर्यतींबाबत केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे, याचा आनंद आहे. बैलगाडी शर्यतींवर बंदी असताना मी मुख्यमंत्री असताना कायदा केला. तो कायदा झाल्यानंतर बैलगाडी शर्यती सुरू झाल्या' असे देवेंद्र फडवीस म्हणाले.

Devendra Fadnavis On Bullock Cart Races
Devendra Fadnavis On Bullock Cart Races

By

Published : May 18, 2023, 4:34 PM IST

बैलगाडी शर्यतीवर फडणवीसांची प्रतिक्रिया

पुणे :बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतींना परवानगी दिली आहे. तामिळनाडू, महाराष्ट्र सरकारच्या कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज हा निकाल देण्यात आला. 'जल्लीकट्टू', बैलगाडी शर्यतींना परवानगी देण्याच्या तामिळनाडू, महाराष्ट्र सरकारच्या कायद्यांना याचिकांमध्ये आव्हान देण्यात आले होते. न्यायमूर्ती केएम जोसेफ, अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस, हृषिकेश रॉय आणि सीटी रविकुमार यांचा समावेश असलेल्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निकाल दिला आहे.

आजचा निकाल शेतकऱ्यांचा :राज्यात बैलगाडी शर्यत सुरू असताना काही संघटनांनी त्याविरोधात न्यायालयात गेल्या. त्यांनी बैल हा प्राणी धावणारा नसल्याचा दावा याचिकेत केला होता. त्यामुळे आम्ही हा कायदा केला तेव्हा कायद्याला पुन्हा स्थगित दिली होती. आम्ही एक समिती स्थापन करून बैलांच्या धावण्याच्या क्षमतेचा वैज्ञानिक अहवाल तयार केला. बैल हा धावणारा प्राणी आहे. मी मुख्यमंत्री असताना आम्ही अहवाल तयार केला. आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालय, नंतर माननीय सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला. त्यानंतर आता आमचे नवीन सरकार आल्यानंतर जेव्हा हे प्रकरण आले तेव्हा आम्ही सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांना विनंती केली. तेव्हा मेहता यांनी बाजी सरकारची बाजु मांडली. महाराष्ट्राच्या वतीने त्यांनी उभे राहून आणि रनिंग अबिलिटी ऑफ बुल म्हणजे बैल हा धावणारा प्राणी आहे. असा युक्तीवाद केला तेव्हा आजचा निकाल आला आहे. हा निकाल शेतकऱ्यांचा निकाल आहे. हा महाराष्ट्राचा विजय असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.

'महाराष्ट्र सरकारने बैलगाडी शर्यतींबाबत केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे, याचा आनंद आहे. बैलगाडी शर्यतींवर बंदी असताना मी मुख्यमंत्री असताना कायदा केला. तो कायदा झाल्यानंतर बैलगाडी शर्यती सुरू झाल्या'- देवेंद्र फडवीस, उपमुख्यमंत्री

न्यायालयाने वैध ठरवल्याचा आनंद : पढे बोलतांना फडणवीस म्हणाले, मला खूप आनंद होत आहे, सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला आहे. आपण केलेला कायदा पूर्णपणे घटनात्मक आहे. हा शेतकऱ्यांचा मोठा विजय, महाराष्ट्राचा मोठा विजय आहे. विशेषत: इथले बरेच लोक ते फॉलो करत होते. आमदार महेश लांडगे असोत की गोपीचंद पडळकर असोत त्यांना सतत याचा पाठपुरवठा केला. आमच्या सरकारने दिलेला अहवाल, न्यायालयाने वैध ठरवल्याचा आनंद असल्याचे फडणीस यांनी म्हटले आहे.


हेही वाचा -

  1. Tulja Bhavani Temple News : अंगावर तोकडे कपडे घालणाऱ्या भाविकांना तुळजापूर मंदिरात दर्शनास मनाई
  2. SC verdict on Jallikattu bullock cart: हुर्रे.. बैलगाडी शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने दिली परवानगी, शर्यती घेण्याचा मार्ग मोकळा
  3. Law Minister of country: किरेन रिजीजू यांना कायदेमंत्री पदावरून हटविले; अर्जुन मेघवाल देशाचे नवे कायदा मंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details