महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

थोडाश्या पावसानेही घरात शिरते पाणी; दत्तवाडीतील गायकवाड कुटुंबाची 3 वर्षांपासून वाताहात - शीला गायकवाड यांची व्यथा

पुणे शहरात अतिवृष्टीने कहर केला आहे. त्यामुळे शहरातील अनेकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. मात्र, गेल्या तीन वर्षापासून दत्तवाडी परिसरातील एक महिला या समस्येला सामोरे जात आहे. पालिका प्रशासनाकडे तक्रारकरूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा फटका त्यांना सातत्याने सहन करावा लागत आहे.

dattawadis residential woman
दत्तवाडी परिसरातील महिलेची 3 वर्षांपासून वाताहात

By

Published : Oct 16, 2020, 2:19 PM IST


पुणे - शहरात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे वेगवेगळ्या भागातील बैठी घरे, सोसायट्यांचे पार्किंग तळ घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. या पावसामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र दत्तवाडी परिसरातील राहणाऱ्या शिला गायकवाड यांना गेल्या 3 वर्षांपासून थोडा जरी पावसाचा जोर वाढला तरी घरात शिरणाऱ्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

थोडाश्या पावसानेही घरात शिरते पाणी
पुणे शहरात बुधवारी सायंकाळी धुवाधार पावसाला सुरुवात झाली. नेहेमीप्रमाणे थोडावेळ पडून पाऊस थांबेल असे वाटत असताना रात्री उशिरापर्यंत विजांच्या कडकडटांसह पावसाने शहराला झोडपून काढले. शहरात काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या, तर सोसायटी आणि वस्तीभागांतील घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटनाही समोर आल्या. या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पाण्याचे प्रवाह नागरिवस्तीतून वाहत असल्याचे दिसून आले. या पावासामुळे आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, महावितरण, अग्निशमन दलाची अक्षरशः धावपळ उडाली. बुधवारी शहरात तब्बल 115.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
दत्तवाडीतील गायकवाड कुटुंबाची 3 वर्षांपासून वाताहात

शहरातील बऱ्याच भागातील नागरिकांना पावसाचे पाणी घरात शिरल्यानंतर कशा प्रकारे समस्या निर्माण होतात. याचा पहिल्यांदाच प्रत्यय आला असेल. मात्र, दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या शिला गायकवाड हे गेल्या ३ वर्षापासून अशा प्रकारच्या समस्येला तोंड देत आहेत. गायकवाड या गेल्या अनेक वर्षांपासून त्या परिसरात राहत आहेत. घरात एकूण 7 सदस्य असून एकत्र कुटुंब राहणाऱ्या या गायकवाड परिवाराला गेल्या 3 वर्षांपासून थोडं जरी जास्त पाऊल झाले तरी घरात पाणी येत असल्याने गायकवाड कुटुंबीयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

दत्तवाडी परिसरातील महिलेची 3 वर्षांपासून वाताहात

तीन वर्षांपूर्वी स्थानिक नगरसेवकाच्यावतीने ड्रेनेज लाईनच काम करण्यात आले. घराच्या शेजारूनच ड्रेनेज लाईनचे काम झाले. मात्र एक ते दीड फुटाची गटार बांधल्याने जास्त पाऊस झाल्याने ड्रेनेज लगेच भरतो आणि संपूर्ण घरात पाणीच पाणी होऊन जाते. या 3 वर्षात पावसाळ्यात अनेक रात्री जागवून घरातील पाणी काढले असल्याची व्यथा त्यांनी ईटीव्ही भारतला सांगितली. अनेक वेळा महापालिकेला तक्रार देऊनही महापालिकेच्या अधिकारांच्यावतीने फक्त आश्वासने दिली जातात. मात्र, कोणतेही काम होत नाही. पावसाच्या पाण्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बेड,घरातील साहित्य किती वेळा बदलायचे. प्रशासनाने ड्रेनेजलाईनचा काम परत करावे, अशी मागणी यावेळी शिला गायकवाड यांनी केली. शहरात जोरदार पाऊस झालं की अनेकांच्या घरात पाणी शिरणे, झाडपडीच्या घटना, घडत असतात पण महापालिकेच्या एका चुकीच्या कामाचा फटका गायकवाड कुटुंबीयांना गेल्या 3 वर्षांपासून बसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details