आळंदी (पुणे) - संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी व देहू शहर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारपासून (दि. 28 जून) ते रविवारपर्यंत (दि. 04 जुलै) पिंपरी-चिंचवड पोलीसांच्या वतीने संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.
आळंदी, देहूगाव परिसरामध्ये आषाढी वारी निमित्त मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येत असतात. त्यामुळे भाविक एकत्र येऊन गर्दी होण्याची व कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी संचारबंदीचा निर्णय घेतला असल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.