महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CDS Anil Chauhan News: चीनच्या तैनात सैन्यांसह शेजारील देशातील अराजकता हे आमच्यासमोर आव्हान-सीडीएस चौहान - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी 144 परेड

सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी यांनी अधिकारी म्हणून उत्तीर्ण झालेल्या पुण्यातील एनडीए कॅडेट्सच्या परेड लाइनची आज पाहणी केली. यावेळी त्यांनी भावी अधिकाऱ्यांनाही संबोधित केले. तसेच पुरस्कार विजेत्या कॅडेट्सना पदके प्रदान केली. यावेळी त्यांनी भारतीय सैन्यदलासमोर असलेल्या आव्हानांबाबत मत व्यक्त केले आहे.

CDS Anil Chauhan News:
सीडीएस चौहान

By

Published : May 30, 2023, 1:38 PM IST

Updated : May 30, 2023, 2:28 PM IST

एनडीए परेड

पुणे: युरोपमधील युद्ध, चीनकडून उत्तरेकडील सीमेवर चीनचे तैनात सैन्य, शेजारील देशांमधील राजकीय आणि आर्थिक अराजकता या सर्वांमुळे भारतीय सैन्यदलासाठी वेगळी परिस्थिती निर्माण होत आहे, असे मत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी मंगळवारी केले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) 144 व्या अभ्यासक्रमाच्या पासिंग आऊट परेड (POP) पुण्यात झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, आपल्या सीमांच्या सुरक्षेसाठी, प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी कटिबद्ध भारतीय सशस्त्र दल कटिबद्ध आहे.

मणिपूरमधील परिस्थितीबद्दल माध्यमांशी बोलताना सीडीएस चौहान म्हणाले, की सैन्यदल, आसाम रायफल्सच्या तुकड्या 2020 पूर्वी मणिपूरमध्ये तैनात करण्यात आल्या होत्या. मणिपूरमधील परिस्थिती बंडखोरीशी संबंधित नसून दोन जातींमधील संघर्ष आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवली आहे. सशस्त्र दल आणि आसाम रायफल्सने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.मणिपूरमधील आव्हाने पूर्णपणे संपलेली नाहीत. परंतु ईशान्येकडील राज्यातील परिस्थिती निवळेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. मणिपूरमध्ये 3 मे रोजी वांशिक दंगली सुरू झाल्यापासून झालेल्या संघर्षात मृतांची संख्या 80 हून अधिक झाल्याचे त्यांनी सांगितले.

सैन्यदलातील घडामोडींमध्ये एक नवीन क्रांती-कॅडेट्सना संबोधित करताना जनरल चौहान म्हणाले की, जागतिक भू-राजकीय व्यवस्था सतत बदलत आहे. सीडीएस जनरल अनिल चौहान म्हणाले की, मी पासिंग आऊट झालेल्या महिला कॅडेट्सचे अभिनंदन करतो. पुरूषांचे वर्चस्व मानले जाणाऱ्या ठिकाणातही यश मिळविल्याने मी महिला कॅडेट्सचे अभिनंदन करतो. तुमच्या पुरुष बांधवांप्रमाणे राष्ट्रहिताचे रक्षण करण्याची जबाबदारी निवडल्याचा आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

जागतिक सुरक्षा परिस्थिती चांगली नसलेल्या काळात आपण जगत आहोत. सैन्यदलामध्ये बहुतांश तंत्रज्ञानावर आधारित नवीन क्रांती होत आहे. भारताच्या सशस्त्र दलातही मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत-सीडीएस अनिल चौहान

हेही वाचा-

  1. Manipur Violence : मणिपूर हिंसाचाराच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा- मल्लिकार्जुन खर्गे यांची राष्ट्रपतींकडे मागणी
  2. Terrorists Killed in Manipur : मणिपूर हिंसाचारानंतर आतापर्यंत 30 दहशतवादी ठार, आसाम रायफल्सची कारवाई
Last Updated : May 30, 2023, 2:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details