पुणे - सरकारच्या उदासीनते विरोधात आवाज उठवण्यासाठी आशा स्वयंसेविकांनी शुक्रवारी (४ डिसेंबर) पुणे जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. "आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा खुर्च्या खाली करा, हम सब एक है, एक रुपयाचा कडी पत्ता सरकार झाले बेपत्ता, आशा युनियनचा विजय असो, अशा सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय", अशा शब्दात आशा स्वयंसेविकांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले.
मतदार संघात कधीच लक्ष न देणाऱ्या आमदार-खासदारांच्या मानधनात वेळोवेळी भरघोस वाढ होते. शिवाय त्यांना भोजन, निवास, प्रवासासह अनेक सोयीसुविधा पुरवल्या जातात. मात्र, तळागाळात जाऊन आरोग्याचे काम करणाऱ्या आशांना तुटपुंजे मानधन दिले जाते. सत्ताधाऱ्यांनी थोडी तरी लाज बाळगून आता तरी आमची वाढीव मानधनाची रक्कम जमा करावी, अशी मागणी मोर्चात सहभागी झालेल्या शेकडो आशांनी केली. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या आशांना आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. ही लाजिरवाणी बाब आहे, असे आशा सेविकांचे म्हणणे आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी निवेदन स्विकारत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
काम बंद करण्याचा इशारा -
मागील तीन ते चार दिवसांपूर्वी दाम नाही तर काम नाही असा निर्धार आशा स्वयंसेविकांनी केला होता. १ डिसेंबर ते १५ डिसेंबर कुष्ठरोग निर्मूलन पंधरवडाचा सर्वे करण्यासही नकार देखील दिला होता. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या आशा स्वयंसेविकाचे पाच महिन्यांचे वेतन रखडले आहे. शासनाने वाढीव मानधनाबाबत दिलेल्या आश्वासनांची अध्याप पूर्तता केली नाही. त्यामुळे दाम नाही तर काम नाही, असा निर्धार आशा स्वयंसेविका यांनी केला आहे. याबाबत शासनाला पत्रकाद्वारे काम बंद करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता.
दिवाळी उलटली अद्याप मानधन नाही -