पुणे- देशभरात करोनाच्या साथीमुळे 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे ऊसतोड मजूरांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. त्यांच्या मदतीला 'भिमाशंकर सहकारी साखर कारखाना' धावून आला आहे. कारखान्याने 6 हजार 500 ऊसतोड मजूरांना सुमारे 25 लाख रुपये किंमतीचा किराणा व भाजीपाला मोफत दिला आहे. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांच्या हस्ते या किराणा मालाचे वाटप करण्यात आले.
'भिमाशंकर' साखर कारखान्याकडून ऊसतोड कामगारांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप - Pune latest news
सध्या राज्यभरात कोरोनाची दहशत असल्यामुळे सर्वत्र संचारबंदी आहे. त्यामुळे भिमाशंकर सहकारी कारखाना परिसरातील 6 हजार 500 ऊसतोड मजूर कारखाना स्थळावरच वास्तव्यास आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना आपल्या गावी जात येत नाही. त्यामुळे या ऊसतोडणी मजूरांना कारखान्याच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांची व्यवस्था करण्यात आली.
!['भिमाशंकर' साखर कारखान्याकडून ऊसतोड कामगारांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप Bhimashankar Sugar Factorie](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6647364-thumbnail-3x2-mum.jpg)
ऊसतोड कामगारांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप
ऊसतोड कामगारांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप
सध्या राज्यभरात कोरोनाची दहशत असल्यामुळे सर्वत्र संचारबंदी आहे. त्यामुळे भिमाशंकर सहकारी साखर कारखाना परिसरातील 6 हजार 500 ऊसतोड मजूर कारखाना स्थळावरच वास्तव्यास आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना आपल्या गावी जात येत नाही. त्यामुळे या ऊसतोडणी मजूरांना कारखान्याच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.