महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालखी सोहळ्यासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या टेम्पोला ट्रकची धडक; ८ जण जखमी

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळंदी येथे निघालेल्या वारकऱ्यांच्या टेम्पोला पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात ८ वारकरी जखमी झाले आहेत.

By

Published : Jun 25, 2019, 2:17 AM IST

पालखी सोहळ्यासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या टेम्पोला ट्रकची धडक

पुणे - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळंदी येथे निघालेल्या वारकऱ्यांच्या टेम्पोला पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात ८ वारकरी जखमी झाले आहेत. शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील जातेगाव फाट्याजवळ सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.

शिक्रापूर पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना उपचारासाठी शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, यातील ४ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details