महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 2, 2019, 7:59 AM IST

ETV Bharat / state

परभणीच्या गोदाकाठचे ग्रामस्थ मतदान न करण्यावर ठाम; तहसीलदारांना निवेदन

सोनपेठ तालुका हा खराब रस्त्यांसाठी प्रसिद्ध होता. या ठिकाणच्या नागरिकांनी तब्बल ५९ दिवस केलेल्या आंदोलनानंतर तालुक्यातील परळीशी जोडणारे २ रस्ते दुरुस्त झाले. मात्र पाथरी, गंगाखेड व परभणीशी जोडणाऱ्या प्रमुख मार्गांची अवस्था अजूनही खराबच आहे. यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा व पुढाऱ्यांना गावबंदीचा निर्णय कायम ठेवला आहे.

तहसीलदारांना निवेदन

परभणी - जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्याच्या गोदावरी नदीकाठावरील गावांच्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा व पुढाऱ्यांना गावबंदीचा निर्णय कायम ठेवला आहे. या संदर्भात सोनपेठच्या तहसीलदारांना निवेदन देवून कळविण्यात आले आहे.

ग्रामस्थांचा विधानसभा मतदानावर बहिष्कार


सोनपेठ तालुका हा खराब रस्त्यांसाठी प्रसिद्ध होता. या ठिकाणच्या नागरीकांनी तब्बल ५९ दिवस केलेल्या आंदोलनानंतर तालुक्यातील परळीशी जोडणारे २ रस्ते दुरुस्त झाले. मात्र पाथरी, गंगाखेड व परभणीशी जोडणाऱ्या प्रमुख मार्गांची अवस्था अजूनही खराबच आहे. तालुक्यातील गोदाकाठाला तर रस्ताच नसल्याने तेथील ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गोदाकाठच्या रस्त्याचा गंभीर प्रश्न पुन्हा पेटला आहे.

रस्त्यांच्या दुरावस्थेला कंटाळले ग्रामस्थ, मतदान न करण्याचा घेतला निर्णय

हेही वाचा - मधमाशांच्या हल्ल्यात 16 जण जखमी; परभणीच्या पूर्णा तालुक्यातील घटना

नुकत्याच झालेल्या पावसामुळे गोदाकाठच्या लासीना, थडी उक्कडगाव, वाडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगा पिंपरी, गोळेगाव, लोहीग्राम या ७ गावांचा संपर्क ८ दिवस तुटला होता. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी गोदाकाठच्या ७ गावांनी थडी उक्कडगाव येथे नुकतीच महापंचायत घेतली. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार, अधिकारी व पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला समर्थन मिळवण्यासाठी तरुण युवकांनी गावोगाव बैठका घेऊन रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मतदान न करण्याच्या निर्णयावर गावकऱ्यांचे समर्थन मिळवले.

हेही वाचा - परभणीत रोपवाटिका चालकाने फसवले; बहारात आलेली मिरची शेतकऱ्याने टाकली उपटून

त्यानुसार गोदाकाठच्या या ७ गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत सोनपेठ तहसीलदारांमार्फत पाथरी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नसल्याचे तसेच अधिकारी व पुढाऱ्यांना गावबंदीचे पत्र दिले आहे. या पत्रात निवडणुकांच्या संबधाने गावात कोणी येऊ नये व आल्यास निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास संबधित जबाबदार असतील, असा इशारा दिला आहे.

हेही वाचा - "त्यांचे रस्ते छान आहेत, आपल्या रस्त्यावर मात्र खड्डे आहेत, त्यामुळे आपणच प्रश्न विचारले पाहिजेत"

ABOUT THE AUTHOR

...view details