कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; जिंतूर तालुक्यातील घटना - शेतकरी
शेतात सतत नापिकीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गजानन रोकडे यांनी महिन्द्रा फायनन्सचे दीड लाख व मध्यवर्ती बँकेचे 50 हजार रुपयाचे कर्ज घेतले होते.
![कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; जिंतूर तालुक्यातील घटना](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3525388-725-3525388-1560189168296.jpg)
मृत गजानन बबनराव रोकडे
परभणी - येथील जिंतूर तालुक्यातील अकोली येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून गजानन बबनराव रोकडे (वय 30) या तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.