महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 5, 2020, 9:26 AM IST

Updated : Jun 30, 2020, 3:56 PM IST

ETV Bharat / state

मुलगी पहायला आले अन् लग्न लावून नेले, जिंतूरात पार पडला हा 'लॉकडाऊन झटपट विवाह'

मानपान, बँडबाजा, आहेर, जेवणावळी, सजावट अशा सर्वच खर्चाला फाटा देऊन या जोडप्याने साधेपणाने सप्तपदी घेऊन आपल्या सुखी संसाराची सुरुवात केली आहे. असेही लॉकडाऊनमुळे थोडक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे पार पडत आहेत. त्यात पुन्हा विवाहाला यायचे म्हटले तर परवानगीची प्रक्रिया येणार. तेव्हा या सर्व भानगडीत न पडता चिद्रवार आणि उत्तरवार परिवाराने हा निर्णय घेतला.

परभणी जिंतूर लॉकडाऊन विवाह
परभणी जिंतूर लॉकडाऊन विवाह

परभणी - लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे अनेकांचे जुळलेले विवाह रद्द झाले, तर काहींनी अगदी साधेपणाने विवाह उरकून घेत संसार सुरू केला आहे. आता यापुढे देखील हीच पद्धत अवलंबावी लागणार आहे. जिंतूर येथे एका मुलीला पाहण्यासाठी आलेल्या वराने जागेवरच पसंती देऊन मुलीसह विवाह करण्याची इच्छा दर्शवली. त्यावर दोन्ही परिवारांनी संमती देऊन लागलीच हा विवाह उरकून देखील घेतला. या 'लॉकडाऊन विवाहा'ची सर्वत्र चर्चा होत आहे.

'मुलगी पहायला आले आणि लग्न लावून गेले' असा योग जिंतूरात घडून आला आहे. जिंतूर शहरातील व्यापारी राजकुमार जगन्नाथ चिद्रवार यांची मुलगी दीक्षा हिला बोधडी (जि. नांदेड) येथील व्यापारी श्रीराम लक्ष्मणराव उत्तरवार आपल्या मुलासह काल बुधवारी पाहायला आले होते. वधू-वरांनी दोघांनीही एकमेकांना पसंती दिली. त्यामुळे दोन्ही परिवाराने संमती देऊन लागलीच श्रीराम उत्तरवार यांचे चिरंजीव सतीश उत्तरवार यांच्याबरोबर दीक्षाचा विवाह लावून दिला. हा सोहळा जिंतूर येथील छत्रपती शिवाजी चौक येथील त्यांच्या राहत्या घरी काल बुधवारी सायंकाळी संपन्न झाला.

परभणी जिंतूर लॉकडाऊन विवाह

मानपान, बँडबाजा, आहेर, जेवणावळी, सजावट अशा सर्वच खर्चाला फाटा देऊन या जोडप्याने साधेपणाने सप्तपदी घेऊन आपल्या सुखी संसाराची सुरुवात केली आहे. असेही लॉकडाऊनमुळे थोडक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे पार पडत आहेत. त्यात पुन्हा विवाहाला यायचे म्हटले तर परवानगीची प्रक्रिया येणार. तेव्हा या सर्व भानगडीत न पडता चिद्रवार आणि उत्तरवार परिवाराने हा निर्णय घेतला.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या परिस्थितीमुळे सर्वच पालक आपल्या मुलांचे लग्न कसे होईल, या चिंतेत आहेत. व्यापारी मुले तर मुली मिळत नसल्याने त्रासून गेले आहेत. मात्र, कोरोना संसर्गामुळे आर्य वैश्य कोमटी समाजात असे लग्न पार पडले, असे मत वैश्य महासभेचे राज्य समन्वयक प्रदीप कोकडवार यांनी व्यक्त केले. तर, समाजाचे अध्यक्ष सखाराम चिद्रवार यांनी दोन्ही परिवाराचे अभिनंदन केले आहे.

Last Updated : Jun 30, 2020, 3:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details