महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 18, 2020, 7:37 PM IST

Updated : Jun 18, 2020, 8:15 PM IST

ETV Bharat / state

'कोरोना'मुळे नाभिक समाजांचा व्यावसाय 'लॉकडाऊन'; परभणीतील व्यावसायिकांवर आली उपासमारीची वेळ

परभणी जिल्ह्यातील नाभिक व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाणे बंद ठेऊन प्रशासनाला सहकार्य केले. परंतु हा हातावर पोट असणाऱ्या नाभिक व्यावसायिकाच्या घरात असलेले राशनपाणी, पैसा-आडका होता, तो या तीन महिन्यात संपला आहे. त्यामुळे नाभिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

parbhani
नाभिक व्यावसायिक

परभणी- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे सुरुवातीपासून आजपर्यंत सलून चालकांचा रोजगार बंद आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून, याविरोधात नाभिक समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र या आंदोलनास मज्जाव करण्यात आल्याने नाभिक समाजबांधवांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

'कोरोना'मुळे नाभिक समाजांचा व्यावसाय 'लॉकडाऊन'; परभणीतील व्यावसायिकांवर आली उपासमारीची वेळ

कोरोनामुळे देशात 22 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये प्रशासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन केले. परभणी जिल्ह्यातील नाभिक व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाणे बंद ठेऊन प्रशासनाला सहकार्य केले. परंतु हा हातावर पोट असणाऱ्या नाभिक व्यावसायिकाच्या घरात असलेले राशनपाणी, पैसा-आडका होता, तो या तीन महिन्यात संपला आहे. त्यात सरकारकडून या व्यावसायिकांना आर्थिक स्वरुपात कुठलीही मदत मिळाली नाही. त्यामुळे नाभिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, रोजगाराअभावी जीवन कसे जगावे ? या विवंचनेतून इरळी येथील नवनाथ उत्तमराव साळुंखे या नाभिक व्यावसायिकाने आपल्या चार वर्षाच्या अजय नावाच्या मुलासह विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. हिच परिस्थिती संपूर्ण राज्यातील सलून व्यावसायिकांवर आली आहे.

नाभिक व्यावसायिकांना चरितार्थ चालविण्यासाठी दुसरे कुठलेही साधन नसल्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. नाभिक व्यवसायिकांची बहुतांश दुकाने ही भाड्याने घेतलेली आहेत. त्यामुळे 3-4 महिन्याचे थकीत भाडे कोठून द्यावे ? दुकान मालक दुकाने खाली करायला लावतील, या धास्तीने व निराशेने नाभिक व्यावसायिकांना ग्रासलेले आहे. त्यामुळे शासनाने नाभिक समाजाला तात्काळ दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करत करण्यात आली.

सहा महिने नाभिक समाजाला आर्थिक मदत करणे गरजेचे आहे, असेही यावेळी निवेदनाद्वारे शासनाला कळविण्यात आले आहे. या शिवाय नाभिक व्यवसायिकांना नुकसानभरपाई म्हणून दर महिन्याला 12 हजार रुपये मदत द्यावी, यासाठी समाजाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार होते. परंतु प्रशासनाने त्यांना आंदोलन करण्यास मज्जाव केल्याने त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या आंदोलनात समाजाचे अध्यक्ष भालचंद्र गोरे, गंगाधर प्रधान, वैजिनाथ राऊत, प्रकाश कंठाळे, विष्णू गोरे, कैलास राऊत, निलेश झगडे आदींसह नाभिक व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Last Updated : Jun 18, 2020, 8:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details