महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 21, 2019, 8:02 PM IST

ETV Bharat / state

पालघरमध्ये 18 ते 20 गावांचा मतदानावर बहिष्कार; वाढवण बंदराला विरोध

वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी वाढवण परिसरातील 18 ते 20 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी वाढवण परिसरातील 18 ते 20 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

पालघर - वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी वाढवण परिसरातील 18 ते 20 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. केंद्र सरकार वाढवण येथे बंदर तयार करणार आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी लगत असलेल्या वाढवणसह वरोर, धाकटी डहाणू, टीगरे पाडा, गुंगवाडा आदी 18 ते 20 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी वाढवण परिसरातील 18 ते 20 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.


वाढवण येथील समुद्रकिनारा मच्छीमारीसाठी गोल्डन बेल्ट म्हणून ओळखला जातो. याच ठिकाणी माशांचं प्रजनन होतं; त्यामुळे या ठिकाणी बंदर झाल्यास हा गोल्डन बेल्ट नष्ट होऊन मासेमारी करणारे व्यवसायिक देशोधडीला लागणार आहेत .अनेक वर्षांपासून मागणी करूनही सरकार वाढवण बंदर प्रकल्प रद्द करत नसल्याने अखेर स्थानिकांनी आक्रमक होऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली. यामुळे 18 ते 20 मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. वाढवण येथे बंदर झाल्यास किनारपट्टीवरील मच्छीमारांचा व्यवसाय कायमस्वरूपी बंद होईल. उपजीविकेचे एकमेव साधन असलेली मच्छीमारी बंद झाल्यास येथील मच्छीमार तसेच डाय मेकिंगचा व्यवसाय करणारे लघुउद्योजक, शेतकरी देशोधडीला लागणार आहेत.

त्यामुळे आक्रमक होत येथील गावांनी मतदान न करण्याची भूमिका घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details