पालघर- 'महा' चक्रीवादळ फटकाचा फटका समुद्र किनाऱ्यावरील गावांना बसला आहे. किनाऱ्यावर उंचच उंच लाटा धडकत असून किनाऱ्यावरील गावांमध्ये समुद्राचे पाणी शिरले आहे. खबरदारी म्हणून दीड हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
किनाऱ्यावरील गावांना 'महा' चक्रीवादळाचा फटका; धडकल्या उंचच उंच लाटा - MAHA CHAKRI WADAL
अरबी समुद्रात 'महा' चक्रीवादळ तयार झाले असून याचा फटका राज्यासह दिव या केंद्रशासीत प्रदेशाला बसलेला पहायला मिळाला. चक्रीवादळामुळे दिव समुद्र किनाऱ्यावर उंचच उंच लाटा धडकल्या असून समुद्र किनाऱ्यावरील काही गावांमध्येही समुद्राचे पाणी शिरले आहे
![किनाऱ्यावरील गावांना 'महा' चक्रीवादळाचा फटका; धडकल्या उंचच उंच लाटा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4995837-67-4995837-1573163419677.jpg)
अरबी समुद्रात 'महा' चक्रीवादळ तयार झाले असून याचा फटका राज्यासह दिव या केंद्रशासीत प्रदेशाला बसलेला पहायला मिळाला. चक्रीवादळामुळे दिव समुद्र किनाऱ्यावर उंचच उंच लाटा धडकल्या असून समुद्र किनाऱ्यावरील काही गावांमध्येही समुद्राचे पाणी शिरले आहे. या भागात वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली असून दीड हजार लोकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे . पुढील सूचना येईपर्यंत मासेमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर पर्यटकांना सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. हे वादळ पुढे सरकून पालघरच्या काही भागाला याचा फटका बसण्याची शक्यता देखील हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आली आहे.