महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरमध्ये ५ वर्षांपासून गटारीची समस्या तशीच, अनेक तक्रारीनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष - Since last 5 years in palghar

कुडूस ही ग्रामपंचायत अर्थिकदृष्ट्या सक्षम मानली जाते. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत औद्योगिक कारखान्याचे जाळे आहे. तसेच सिमेंट काँक्रीटचे जंगलही येथे झपाट्याने वाढले आहे. तर येथील नाना अपार्टमेंट जवळच्या गटारीचे पाणी तुंबले आहे.

गटारीच्या पाण्याच्या निचरा न झाल्यामुळे पाणी रस्त्यावर आले आहे.problem with the mortgage remains the same

By

Published : Sep 8, 2019, 6:00 PM IST

Updated : Sep 8, 2019, 6:30 PM IST

पालघर - वाडा तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील नाना अपार्टमेंटजवळ गटाराचे पाणी तुंबल्याने येथील नागरिकांना मोठ्या दुर्गंधीचा सामना करण्याबरोबरच गटाराच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो. या समस्येप्रकरणी स्थानिक रहिवाशांनी ग्रामपंचायत आणि वाडा तहसीलदार कार्यालयाला निवेदन दिले होते. मात्र ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही स्थानिक रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे गेली चार ते पाच वर्षात न सुटलेली समस्या केव्हा सुटेल? असा प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत.

पालघरमध्ये ५ वर्षांपासून गटारीची समस्या तशीच, अनेक तक्रारीनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष

हेही वाचा -दिल्लीतील गांधी आश्रम आजही केंद्र सरकारकडून मदतीच्या प्रतिक्षेत...

वाडा तालुक्यातील कुडूस ही ग्रामपंचायत अर्थिकदृष्ट्या सक्षम मानली जाते. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत औद्योगिक कारखान्याचे जाळे आहे. तसेच सिमेंट काँक्रीटचे जंगलही येथे झपाट्याने वाढले आहे. तर येथील नाना अपार्टमेंट जवळच्या गटारीचे पाणी तुंबले आहे. यामुळे येथील रहिवासी आणि व्यावसायिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. गटारीतून पाण्याचा निचरा होत नसल्याने गुडघाभर गटाराच्या पाण्यातून नागरिकांना येथून जावे लागते. पावसाळ्यात ही समस्या कायम राहते. गेल्या चार ते पाच वर्षांपासून ही समस्या कायम आहे.

हेही वाचा -'राजा हिंदुस्तानी' फेम कथ्थक गुरु वीरु कृष्णनन यांचे निधन

या अपार्टमेंट जवळून भिवंडी-वाडा महामार्ग गेला आहे. पाणीच्या निचऱ्याबाबत ग्रामपंचायतीकडे नागरिकांनी अनेकदा तक्रार केली. मात्र, त्यांनी या समस्येवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवले. तर आता इतके दिवस होऊनही तोडगा न निघाल्यामुळे या समस्येवर तोडगा कधी निघणार हा प्रश्न येथील रहिवाशांना सतावत आहे.

हेही वाचा -पुढच्या वर्षी लवकर या..! मुंबईत ४४ हजार गौरी-गणपतीचे विसर्जन

प्रतिक्रिया -

माझे येथे मेडिकलचे दुकान आहे. येथे कायम गटारातून पाण्याचा निचरा होत नसल्याने येथे पाऊस थांबला तरी पाणी साचत असते. हे पाणी माझ्या दुकानाच्या पायरी पर्यंत तर कधी दुकानात शिरते. त्यामुळे दुकानातली महागडी औषधे खराब होतात. ग्राहक सुद्धा पाण्यातून येत नाहीत. त्यामुळे आमच्या धंद्यावर परिणाम होतो. ही समस्या तत्काळ सोडवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
- मुकेश शर्मा (मेडिकल दुकानधारक, कुडूस)

Last Updated : Sep 8, 2019, 6:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details