पालघर - जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्याध्यापक, प्राचार्यांनी आज सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवावीत. तसेच, जे विद्यार्थी शाळेत आलेले असतील त्यांना सुखरूप पालकांच्या हाती देऊनच शाळा सोडावी, असे निर्देश पालघर जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.
पालघरमध्ये कोसळधार.. शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, घराबाहेर न पडण्याचे नागरिकांना आवाहन - जिल्हाधिकारी कार्यालय
आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष येथे 02525-297474 या क्रमांकावर व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम यांना 9158760756 या क्रमांकावर संपर्क करण्याचे अवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

holiday declared for schools and colleges in palghar amid heavy rainfall
पालघरमध्ये कोसळधार.. शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, घराबाहेर न पडण्याचे नागरिकांना आवाहन
नागरिकांनी आवश्यक असल्यासच बाहेर पडावे. पाण्याखाली गेलेले रस्ते, पूल, नदी याठिकाणी पर्यटनासाठी जाण्याचे धाडस करू नये. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष येथे 02525-297474 या क्रमांकावर व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम यांना 9158760756 या क्रमांकावर संपर्क करण्याचे अवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
Last Updated : Aug 3, 2019, 10:57 AM IST