पालघर -मागील २४ तासात जिल्ह्यात सरासरी १९५.४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३४२ मिमी पाऊस वसई तालुक्यात झाला आहे. यामुळे वसई, नालासोपारा आणि विरार येथे अनेक भागात पाणी साचले आहे.
पावसामुळे वसंतनगरी, मिठाघर, नवघर ईस्ट, तुळींज-आचोळा रोड, जुने विवा कॉलेज, विरार वेस्ट या भागात पाणी साचले आहे. आता पावसाचा जोर कमी झाला असला तरीही नवघर मिठागर परिसरात समुद्रात आलेल्या भरतीमुळे पूरस्थिती आहे. या ठिकाणाहून अग्निशनम दलाने एक रुग्णाला सुखरूप बाहेर काढले असून, डॉक्टरांच्या एका पथकानेही या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांची तपासणी केली आहे.