महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सर्वांची विमाने उतरतील अशी धावपट्टी तयार करायची आहे - मुख्यमंत्री - राज्यपालांना विमान नाकारल्याचा विषय

पालघर येथील जव्हार भागात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एका दौऱ्यानिमित्त आले होते. त्यांनी यावेळी सर्वांची विमाने उतरलतील, अशी धावपट्टी तयार करायची आहे, असे खोचक वक्तव्य प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. जिल्ह्यातील जव्हार भागात त्यांनी धावता दौरा केला.

पालघर

By

Published : Feb 12, 2021, 3:55 PM IST

Updated : Feb 12, 2021, 5:18 PM IST

पालघर- राज्यपालांना हेलीपॅड नाकरले गेले हा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. पालघर येथील जव्हार भागात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एका दौऱ्यानिमित्त आले होते. त्यांनी यावेळी सर्वांची विमाने उतरलतील, अशी धावपट्टी तयार करायची आहे, असे खोचक वक्तव्य प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. जिल्ह्यातील जव्हार भागात त्यांनी धावता दौरा केला.

पालघर

या भागात कुपोषणाचे प्रमाण जास्त असून बालमृत्यूची समस्या गंभीर आहे, असे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे. हा माझा पहिला दौरा असून तो धावता दौरा आहे. यापुढे मी जव्हारला भेट देईन. या भागात कुपोषणामुळे होणारी कोवळी पानगळ थांबवण्याचे आव्हान आहे. कुपोषण कमी करायचे आहे. आदिवासी संस्कृतीची जपणूक करून विकास साधायचा आहे.

कुपोषणाची समस्या सोडवायची आहे.

पालघर जिल्हा नवीन निर्माण झाल्याने येथे सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, हे शासनाचे काम आहे. कुपोषणाची समस्या कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच जव्हार हिल स्थानक आहे. येथे पर्यटन विकास करून यातूनही कुपोषणाची समस्या सोडवायची आहे. त्याचबरोबर आदिवासी समाजाची संस्कृती जपून येथील विकास साधायचा आहे. त्याचबरोबर येथील पाण्याचा प्रश्न, पर्यटन विकास करायचा आहे. जेणे करून येथील समस्या सुटतील.

राज्यपालांचे विमान प्रकरण काय?

काल (गुरुवारी) 11 फेब्रुवारीला राज्यपाल यांना उत्तराखंड येथे कार्यक्रमानिम्मित जायचे होते. मात्र, त्यांच्या विमान प्रवासाला राज्यसरकारकडून नकार कळवण्यात आला. त्यामुळे राज्यपालांना विमानातून खाली उतरण्याची नामुष्की आली. त्यानंतर राजकीय बराच वादही पेटला. त्यामुळे आज राजभवनावर जाऊन तेथील हेलिपॅड वापरणेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज पालघरमध्ये नियोजित दौरा असून वर्षा बंगला येथून मुख्यमंत्री थेट महालक्ष्मी रेसकोर्सच्या हेलिपॅडच्या दिशेने निघाले. मुख्यमंत्र्यांचे निवस्थान आणि कार्यालय असलेला वर्षा बंगला आणि राजभवन हे अंतर अगदी हाकेच्या अंतरावर असूनही पुन्हा राज्यपाल आणि मुख्यमंत्री वाद होऊ नये, याची दक्षता घेत त्यांनी राजभवनावर जाणे टाळले.

साधुंची हत्या केलेल्या ठिकाणाला भेट नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज पालघर दौरा होता. आमची अपेक्षा होती की, ज्या ठिकाणी आमचे दोन हिंदू साधुंना ठेचून मारले त्या ठिकाणी जाऊन ते या साधूंना आदरांजली वाहतील किंवा पत्रकार परिषदेत या घटनेचा तपास कशा पद्धतीने सुरू आहे, याची माहिती देतील. पण, राज्यपालांच्या नजरेला नजर भिडवता येऊ नये म्हणून रेसकोर्सवरून उड्डाण करणारे मुख्यमंत्री हिंदुत्व सोडल्याच्या भावनेतूनच हिंदू समाजाला काय तोंड दाखवणार म्हणून ना घटनास्थळी गेले ना साधु-संतांविषयी चकार शब्द काढला, असे भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी सांगितले.

भाजप नेत्या पंकजा मुंडेंची राज्यसरकारवर टीका -

भाजपच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उज्जैनला पोहचलेल्या भाजप नेत्या आणि मध्यप्रदेशच्या सह प्रभारी पंकजा मुंडे यांनी राज्य सरकावर टीका केली. राज्यपालांना विमानप्रवास नाकारणे हा त्या संवैधानिक पदाचा अपमान आहे. उच्चस्तर समितीद्वारे याप्रकरणाची चौकशी केली जावी, असे त्या म्हणाल्या.

Last Updated : Feb 12, 2021, 5:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details