महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; सहा जण ठार

मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या भरधाव कार समोर बाईकस्वार आल्याने हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.

By

Published : May 10, 2019, 6:21 PM IST

Updated : May 10, 2019, 7:32 PM IST

मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या भरधाव कार समोर बाईकस्वार आल्याने हा भीषण अपघात घडला आहे

पालघर:मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली येथे दोन कार आणि एक बाईक यांचा भीषण अपघात होऊन ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश असून २ जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या भरधाव कार समोर बाईकस्वार आल्याने हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे .

मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या भरधाव कार समोर बाईकस्वार आल्याने हा भीषण अपघात घडला आहे

या अपघातात मोटारसायकल वरील नवनाथ रमाकांत नवले (वय २५, रा. कोसरा, ता. मोखाडा) यांचा मृत्यू झाला आहे. तर नरेश नारायण सुपे (वय २३, रा. सातोरी ता. मोखाडा) हे जखमी झाले आहेत.

स्विफ्ट कारमधील (एमएच ४८ P ९६७६ )भागवत दगडू जाधव (वय ५५ रा. पनवेल) आणि दिलीप मधुकर चांदणे (वय ३० रा. पनवेल) या दोघांचा मृत्यू झाला आहे.

पोलो कारमधील (एमएच १५ एफएफ २३१०) प्रतिभा परिमल शहा (वय ७० रा. कांदिवली) , राकेश प्रविणलाल शहा ( वय ६०, रा. कांदिवली) आणि आकाश चव्हाण (वय ३५, रा. बोरिवली) या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर जिंदल हिरेन शहा (वय २२ , रा. कांदिवली ) हा जखमी आहे.

Last Updated : May 10, 2019, 7:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details