महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 13, 2022, 8:20 PM IST

ETV Bharat / state

Har Ghar Tiranga तिरंगा घरावर लावताना पाय घसरून पडल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी हर घर झेंडा लावण्याचा उपक्रम मोठ्या दिमाखात सुरू आहे Independence Day शहर तसेच ग्रामीण भागातही देशाविषयी असणारे प्रेम आणि प्रशासनाकडून जव्हार तालुक्यात शुक्रवारपासून करण्यात येत असलेले हर घर झेंडा अभियान या गोष्टीला प्रेरित होऊन तालुक्यातील ग्रामीण भाग असणाऱ्या नांदगाव पैकी राजेवाडी या गावातील 65 वर्षीय लक्ष्मण भाऊ शिंदे हे त्यांच्या घरावर झेंडा लावण्यासाठी चढले असताना कौले फुटून खाली पडल्याने गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला

तिरंगा घरावर लावताना पाय घसरून पडल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
तिरंगा घरावर लावताना पाय घसरून पडल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

जव्हार (पालघर)- देशाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी हर घर झेंडा लावण्याचा उपक्रम मोठ्या दिमाखात सुरू आहे Har Ghar Tiranga शहर तसेच ग्रामीण भागातही देशाविषयी असणारे प्रेम आणि प्रशासनाकडून जव्हार तालुक्यात शुक्रवारपासून करण्यात येत असलेले हर घर झेंडा अभियान या गोष्टीला प्रेरित होऊन तालुक्यातील ग्रामीण भाग असणाऱ्या नांदगाव पैकी राजेवाडी या गावातील 65 वर्षीय लक्ष्मण भाऊ शिंदे हे त्यांच्या घरावर झेंडा लावण्यासाठी चढले असताना कौले फुटून खाली पडल्याने गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला

जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल शिंदे हे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड या कार्यालयात सेवा देऊन 5 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते शनिवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरावरती तिरंगा लावण्यासाठी चढल्यानंतर कौले फुटून खाली पडले त्यानंतर तात्काळ त्यांना जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु दुखापत अधिक झाल्याने नाशिक येथील रुग्णालयात पाठविण्यात आले होते परंतु तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांची प्राणज्योत मालवली हर घर झेंडा उपक्रमातून नाहक बळी गेल्याची टीका जव्हार तालुक्यातून होत आहे

केवळ झेंडा लावून समस्या सुटणार नाही देशाच्या पंतप्रधान महोदयांनी हर घर तिरंगा लावायला देण्याऐवजी मुळातच 75 वर्ष होऊन देखील जव्हार तालुक्यामध्ये आजही प्रत्येक गावात रुग्णवाहिका जात नाही पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही शिक्षणाची आणि रोजगाराची वाणवा शासकीय योजनांच्या जनजागृतीचा अभाव अशी गंभीर परिस्थिती असताना प्रत्येकाला घर रोजगार देणे महत्वाचे आहे केवळ झेंडा लावून समस्या सुटणार नाही अशी शोकभावना बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी व्यक्त केली

हेही वाचा -Condom to New Married Couple सरकार नवविवाहित जोडप्यांना करणार कंडोमचे वाटप

ABOUT THE AUTHOR

...view details