पालघर- गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने तिघांची हत्या केली होती. याप्रकरणी कासा पोलीस ठाण्यातील आणखी ३ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणात आतापर्यंत एकूण ५ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निलंबन, तसेच ३५ कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे.
गडचिंचले तिहेरी हत्याप्रकरण; कासा पोलीस ठाण्यातील आणखी ३ कर्मचाऱ्यांचे निलंबन - kasa police thane
आज पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी याप्रकरणी कासा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंखे, हवालदार संतोष मुकणे व नरेश धोडी या तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला असून पोलिसांनी आतापर्यंत १०१ आरोपींना अटक केली आहे.
![गडचिंचले तिहेरी हत्याप्रकरण; कासा पोलीस ठाण्यातील आणखी ३ कर्मचाऱ्यांचे निलंबन kasa police thane](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6987881-thumbnail-3x2-op.jpg)
डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे चोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक, अशा तिघांची हत्या केली होती. हा मुद्दा देशभर गाजला, तसेच हे प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. आज पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी याप्रकरणी कासा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंखे, हवालदार संतोष मुकणे व नरेश धोडी या तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला असून पोलिसांनी आतापर्यंत १०१ आरोपींना अटक केली आहे.
हेही वाचा-लॉकडाऊन 2 : पालघर नगरपालिका क्षेत्र 2 मे पर्यंत पूर्णतः बंद