महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबाद नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शांततेत, साहित्य सम्मेलनासाठी दीड लाखांचा निधी मंजूर

विषय पत्रिकेतील ३२ विषय चर्चा करून मंजूर करण्यात आले. त्यापैकी शहरातील शाळांची असणारी दुरुस्ती सीएसआर फंडातून करण्यात येणार आहे. रक्कम कमी पडल्यास इतर निधी वापरून दुरुस्ती करण्यात येणार आहेत. मालमत्ता कराचे सर्वेक्षण करताना ज्यांची एजन्सीच्या चुकीने भोगवटादार अशी नोंद झाली आहे, अश्या नोंदी जुने रेकॉर्ड तपासून रद्द केल्या जाणार आहेत.

By

Published : Nov 21, 2019, 5:49 AM IST

उस्मानाबाद नगरपालिका

उस्मानाबाद - सातत्याने गडबड गोंधळाची परंपरा असलेल्या उस्मानाबाद नगरपालिकेची सर्व साधारण सभा पहिल्यांदाच शांततेत पार पडली. नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत आहे. पण, नगराध्यक्ष शिवसेनेचा आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात नेहमी खटके उडत असतात. पण, यावेळी हे चित्र बदलल्याने आश्चर्च व्यक्त केले जात आहे.


सभेमध्ये ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दीड लाख रुपयांचा निधी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. गटनेते युवराज नळे यांनी १० लाख रुपयांची मागणी केली होती. परंतु शासन निर्णयानुसार दीड लाख देता येत असल्याने नगरपालिकेला तेवढीच मदत करता येणार आहे.

हेही वाचा -लाखो रुपये मंजूर होऊनही स्मशानभूमी नाही; काक्रंबा गावातील ग्रामस्थ संतापले

विषय पत्रिकेतील ३२ विषय चर्चा करून मंजूर करण्यात आले. त्यापैकी शहरातील शाळांची असणारी दुरुस्ती सीएसआर फंडातून करण्यात येणार आहे. रक्कम कमी पडल्यास इतर निधी वापरून दुरुस्ती करण्यात येणार आहेत. मालमत्ता कराचे सर्वेक्षण करताना ज्यांची एजन्सीच्या चुकीने भोगवटादार अशी नोंद झाली आहे, अश्या नोंदी जुने रेकॉर्ड तपासून रद्द केल्या जाणार आहेत.

हेही वाचा -आर्द्रता मिटरच्या माध्यमातून होतीय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची लूट

ही सभा राणा जगजितसिंह पाटील यांच्या भाजपा प्रवेशा नंतर पहिल्यांदाच घेण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अप्रत्यक्ष भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे बोलले जात आहे. यामुळेच ही सर्वसाधारण सभा शांततेत पार पडल्याचे बोलले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details