महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात, आज अचलबेटवरून निघणार साहित्याची ज्योत

साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार असून ग्रंथप्रदर्शन, तुळजापूर, पारंपरिक गोंधळ, कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, कथा-कथन, कवी कट्टी, बालकुमार मेळावा, असे विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

By

Published : Jan 3, 2020, 8:15 AM IST

Updated : Jan 3, 2020, 11:27 AM IST

93 akhil bhartiy marathi sahitya sammelan
साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

उस्मानाबाद -येत्या १० जानेवारीला सुरू होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरदार सुरू आहे. संत गोरोबाकाका साहित्यनगरी येथे हे संमेलन होणार आहे. यानिमित्त आज (३ जानेवारी) ला संमेलनाच्या जनजागृतीसाठी साहित्याची ज्योत निघणार असून अचलबेट येथून या ज्योतीची सुरुवात होणार आहे. त्याचा समारोप ४ जानेवारीला उस्मानाबाद येथे होणार असल्याचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी सांगितले.

साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार असून ग्रंथप्रदर्शन, तुळजापूर, पारंपारिक गोंधळ, कवी संमेलन, सांस्कृतीक कार्यक्रम, कथा-कथन, कवी कट्टी, बालकुमार मेळावा, असे विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. संमेलनासाठी ३ सभा मंडपाची उभारणी सुरू असून या सभामंडपाना शाहीर अमर शेख, दत्तो आप्पा तुळजापूरकर, सेतू माधव पगडी यांची नावे देण्यात आली आहेत.

हे वाचलं का? -९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, तयारीत चिमुकल्यांचा हातभार

तुळजाभवानीचे मंदिर आणि रूप असलेल्या देखाव्यासह भाई उद्धवराव पाटील यांच्या नावाने संमेलनाचे प्रवेशव्दार उभारण्यात येणार आहे. या संमेलनासाठी देशभरातून 600 कवी 3 दिवसात कवितांचे सादरीकरण करणार आहेत. त्याचबरोबर साहित्य संमेलनाची स्मरणिका 'पोत' या नावाने प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकभाषा, लोकजागर, साहित्य, संस्कृती आणि पर्यटनाची माहिती असणार आहे.

Last Updated : Jan 3, 2020, 11:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details