महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाण्याच्या शोधात असलेले हरणाचे पाडस विहिरीत पडले, येवल्याच्या तरुणाने वाचवले प्राण

काही हरणे अन्न पाण्याच्या शोधामध्ये मानवी वस्तीकडे धाव घेत असतात. मात्र, कधी कुत्र्याच्या हल्यात किंवा वाहनाच्या धडकेत या वन्यजीवांना आपले प्राण गमवावे लागतात. येवला तालुक्यात अशाप्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत.

By

Published : May 6, 2019, 9:01 AM IST

येवल्यातील ममदापूर येथील तरुणाने वाचवले हरणाच्या पाडसाचे प्राण

नाशिक -येवला तालुक्यात ममदापूर येथे पाण्याच्या शोधात आलेले हरणाचे पाडस विहिरीत पडले होते. पाडस विहिरीत पडल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येताच गावातील तरुण बाळू बत्तासे याने जिवाची पर्वा न करता ५० फूट खोल विहिरीत उडी मारून हरणाच्या पाडसाचा जीव वाचवला.

येवल्यातील ममदापूर येथील तरुणाने वाचवले हरणाच्या पाडसाचे प्राण

काही हरणे अन्न पाण्याच्या शोधामध्ये मानवी वस्तीकडे धाव घेत असतात. मात्र, कधी कुत्र्याच्या हल्यात किंवा वाहनाच्या धडकेत या वन्यजीवांना आपले प्राण गमवावे लागतात. येवला तालुक्यात अशाप्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे वन्यजीव विभागाने प्राण्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती बाळू बत्तासे यांनी केली आहे. तसेच, वनविभागालगत असलेल्या शेतातील विहिरवरही कठडे बांधून दिल्यास वन्यजीव विहरीत पडणार नाहीत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

इतक्या खोल आणि अवघड विहिरीतून पाडसाला व्यवस्थित वर काढण्यात आल्याने बाळू बत्तासे या युवकाचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details