महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 26, 2021, 12:06 AM IST

Updated : Aug 26, 2021, 12:22 AM IST

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांनी वैयक्तीक बाबींसाठी पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला - डॉ. भारती पवार

केंद्रीय अधिवेशन काळात विरोधक मोठ्या संख्येने गदारोळ करतात. तेव्हाही केंद्र सरकार, पंतप्रधान किंवा सभागृहाचे सभापती त्यावर लगेच कारवाई करतात का? असे कधी झाले नाही. भाजपाची तशी संस्कृती नसल्याचे सांगत ही हुकूमशाही राज्यात चालणार नसल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

भारती पवार
भारती पवार

नाशिक - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर करण्यात आलेली कारवाई म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैयक्तीक बाबींसाठी राज्याच्या पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला गेला, असा घणाघाती आरोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केला आहे.

डॉ. भारती पवार


'राज्य सरकारची हुकूमशाही राज्यात चालणार नाही'

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. भारती पवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. वैयक्तीक बाबींसाठी संपूर्ण पोलीस यंत्रणेचा वापर मुख्यमंत्र्यांनी केला आहे, हे चुकीचा आहे. भारतीय जनता पार्टी हे कधीही खपवून घेणार नाही. केंद्रीय अधिवेशन काळात विरोधक मोठ्या संख्येने गदारोळ करतात. तेव्हाही केंद्र सरकार, पंतप्रधान किंवा सभागृहाचे सभापती त्यावर लगेच कारवाई करतात का? असे कधी झाले नाही. भाजपाची तशी संस्कृती नसल्याचे सांगत ही हुकूमशाही राज्यात चालणार नसल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

'जन आशिर्वाद यात्रेची धास्ती'

जनतेच्या भेटीसाठी काढण्यात येणाऱ्या जन आशीर्वाद यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहूनच राज्य सरकार, शिवसनेने धास्ती घेतली आहे. या यात्रांमध्ये खोडा घालण्याचे कामच राज्य सरकारने केल्याची टीकाही भारती पवार यांनी केली आहे.

'मुख्यमंत्री दगडफेक करणाऱ्यांना प्रोत्साहन देतात?'

भाजपाच्या कार्यालयांवर दगडफेक केली. तोडफोड केली. अशा गुंडांचा बोलवून शिवसेनेकडून सत्कार केला जात आहे. म्हणजे मुख्यमंत्री कारवाई करण्याचे तर सोडाच पण या गुंडाना प्रोत्साहन देत असल्याचेच या घटनांतून दिसून येत असल्याचा आरोपही डॉ.भारती पवार यांनी केला आहे.

हेही वाचा -अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करा-अतुल भातखळकर

Last Updated : Aug 26, 2021, 12:22 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details