महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Silk Farming Nashik : शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीतून साकारली आधुनिक 'रेशीम शेती'; वर्षाला मिळतोय भरघोष उत्पन्न - कृष्णनगरचे शेतकरी सखाहरी जाधव रेशीम शेती

इगतपुरी तालुक्यातील कृष्णनगरचे शेतकरी सखाहरी जाधव ( Farmer Sakhahari Jadhav of Krishnanagar ) यांनी पारंपारिक शेतीला पर्याय म्हणून सेंद्रिय शेतीतून ( Organic farming ) आधुनिक रेशीम शेती ( Silk farming Nashik ) साकारली आहे. यातून त्यांना वर्षाला 8 ते 10 लाख रुपये मिळत असून ते शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे. कृषी विभागाने ( Agriculture Department ) देखील त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना आदर्श कृषी पुरस्काराने सन्मानित केल आहे.

रेशीम शेती
रेशीम शेती

By

Published : Jun 5, 2022, 3:24 PM IST

Updated : Jun 5, 2022, 3:35 PM IST

नाशिक -सध्या पारंपरिक शेती करताना लागणार खर्च, मिळणारे उत्पादन आणि मिळणारा बाजारभाव हे समीकरण अनेकदा तोट्यात चालले आहे. त्यात रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीची सुपीकता आणि जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कृष्णनगरचे शेतकरी सखाहरी जाधव ( Farmer Sakhahari Jadhav of Krishnanagar ) यांनी पारंपारिक शेतीला पर्याय म्हणून सेंद्रिय शेतीतून ( Organic farming ) आधुनिक रेशीम शेती ( Silk farming Nashik ) साकारली आहे. यातून त्यांना वर्षाला 8 ते 10 लाख रुपये मिळत असून ते शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे. कृषी विभागाने ( Agriculture Department ) देखील त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना आदर्श कृषी पुरस्काराने सन्मानित केल आहे.

प्रतिक्रिया देताना शेतकरी


प्रयोगशील शेती :ड्रीपच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने दीड एकर शेतीत रेशीम लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग जाधव यांनी केला आहे. पिकवलेला रेशीमचा पाला अथवा तुती हा अळ्यांचे खाद्य असून त्यांनी यासाठी वीस बाय पन्नासचे शेड उभे केले आहे. साधारण तीस दिवसात अळ्या तयार होतात. त्यांची रेशीम जालना येथे विक्रीसाठी जात आहे. तुती लागवडीचे सहा महिन्यात पहिले पीक येते. रेशीमच्या अळ्यांना बाजारात 500 ते 600 रुपये किलोप्रमाणे बाजारभाव मिळतो. दरमहिन्याला साधारण 1 लाख 80 हजार उत्पन्न त्यांना मिळत आहे.


आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मान :रेशीम पीक प्रयोगामुळे या वर्षी रेशीमला चांगला भाव असल्याने वर्षाला 8 ते 10 लाखांचे विक्रमी उत्पन्न मिळाले. काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आदर्श शेतकरी पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा रेशीम संचानालयतर्फे रेशीम श्री पुरस्कार देखील नाना जाधव यांना मिळाला आहे. नवीन प्रयोगात त्यांची पत्नी तुळसाबाई, वडील, मुले देखील मदत करतात. त्यांचा प्रयोग पाहून तालुक्यातील शेतकरी देखील सरसावले आहेत. विशेष म्हणजे या शेतीत कीटकनाशके फवरण्याची देखील गरज भासत नाही. तुती लागवडीसाठी जीवामृत, शेणखत, गांडूळ खत या सेंद्रिय खतांचा वापर करून उत्पादन मिळाले. जाधव हे महाराष्ट्रात शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन देण्याचे महत्वपूर्ण काम करत असतात.

हेही वाचा -Amravati BJP Agitation : चांदूर बाजारात भाजपचे 'दफन आंदोलन', रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

Last Updated : Jun 5, 2022, 3:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details