नाशिक : भारतीय सैन्य दलात चार वर्षासाठी सेवा बजावण्याची (protect country) संधी अग्निपथ या योजने अंतर्गत (Agneepath Yojana) तरुणांना देण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्रातील नाशिकच्या आर्टिलरी सेंटर अहमदनगरच्या सैनिकी केंद्र पुणे येथील सैनिकी केंद्र तसेच नागपूर येथे अग्निवीर म्हणून दाखल होणाऱ्या सामान्य तरुणांना सैनिक (Thousands of Soldiers) म्हणून घडवले जात आहे. यासाठी नाशिकच्या अल्टिलरी सेंटरमध्ये अग्निविर रिसेप्शन सेंटर उभारण्यात आले आहे. या केंद्रातून त्यांचे बायोमेट्रिक तपासणीपासून ते सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येते. त्यानंतर त्यांना भारतीय सैन्य दलाच्या कारकिर्दीवर प्रकाश झोत टाकणारा लघुपट दाखविला जातो. या सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर सैनिक अधिकारी त्यांची मुलाखत घेऊन नेमणूक करतात. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचं खडतड प्रशिक्षण (Soldiers Training) सुरू होतं.
31 आठवड्यांचे प्रशिक्षण :नाशिकच्या तोफखाना केंद्रातून प्रशिक्षण घेणाऱ्या अग्निवीरांना भारतीय सैन्यात तोफा चालवणारा गनर, रेडिओ ऑपरेटर, तांत्रिक सहाय्यक, मोटर ड्रायव्हर या चार महत्त्वाच्या पदांवर सेवा बजवण्याची संधी मिळणार आहे. यासाठी मूलभूत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षकांकडून दिले जात आहे. यामध्ये 10 आठवड्याचे प्राथमिक सैनिकी प्रशिक्षण व 21 आठवड्यांचे ॲडव्हान्स सैनिकी प्रशिक्षणाचा समावेश आहे. एकूण 31 आठवड्यांचे प्रशिक्षण कालावधी राहणार असल्याचं लष्कर अधिकाऱ्यांनी सांगितले.