नाशिक- या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजप सेनेला स्पष्ट बहुमत दिले आहे. सत्तेचा उन्माद महाराष्ट्रात करता येत नाही, हे जनतेने दाखवून दिले आहे. लोकांचा निर्णय आम्हाला विरोधात बसवण्याचा आहे. आम्ही ती भूमिका पार पाडू. मात्र, आज जो चाललाय तो सर्व पोरखेळ आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सेना भाजपवर केली आहे. नाशिक येथे परतीच्या पावसाने शेती पिकाचे मोठ्या नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा-देशाच्या उत्पादन क्षेत्रात मंदावली हालचाल; गेल्या दोन वर्षात 'पीएमआय'ने नोंदविला निचांक
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारकडून किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे. झालेल्या नुकसानीबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकारला माहिती देणार असल्याचेही पवार म्हणाले.