महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 14, 2019, 7:36 PM IST

ETV Bharat / state

शांतिगिरी महाराजांचा हेमंत गोडसेंना पाठिंबा, तर समीर भुजबळांना अशिर्वाद

हेमंत गोडसेंना शांतिगिरी महाराजांनी एक पत्रक काढून पाठिंबा दिला आहे. तर समीर भुजबळ यांनाही आशिर्वाद दिला आहे. त्यामुळे आता पाठिंबा कामी येणार की आशिर्वाद हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शांतिगिरी महाराजांचा हेमंत गोडसेंना पाठिंबा, तर समीर भुजबळांना अशिर्वाद

नाशिक- औरंगाबादच्या राजकारणात जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज यांचे चांगलेच प्रस्त आहे. त्याबरोबरच आता नाशिकच्या राजकारणातही त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केल्याचे दिसत आहे. युतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी शांतिगिरी महाराजांची त्यांच्या आश्रमात भेट घेतली. यावेळी हेमंत गोडसेंना महाराजांनी एक पत्रक काढून पाठिंबा दिला आहे. तर समीर भुजबळ यांनाही आशिर्वाद दिला आहे. त्यामुळे आता पाठिंबा कामी येणार की आशिर्वाद हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शांतिगिरी महाराजांचा हेमंत गोडसेंना पाठिंबा, तर समीर भुजबळांना अशिर्वाद

महामंडलेश्वर शांतिगिरी महाराजांचा नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंना पाठिंबा असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. 'लढा हा राष्ट्रगीताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा' या जनजागृती अभियानांतर्गत हेमंत गोडसे यांना पाठिंबा दिल्याची माहिती जय बाबाजी परिवारचे राजकीय समिती अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details