महाराष्ट्र

maharashtra

पंतप्रधान मोदी आज नाशकात; सभास्थळी पिशवी, भाजीपालाही घेऊन जाण्यास मनाई

By

Published : Sep 19, 2019, 11:25 AM IST

Updated : Sep 19, 2019, 12:37 PM IST

मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरासह जालना, सांगली, जळगाव, धुळे या जिल्ह्यातील सुमारे बारा बॉम्ब स्कॉड पथके नाशिकमध्ये दाखल झाली आहेत. नागरिकांना मोबाईल वगळता कोणतीही वस्तू सोबत बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी आज नाशिक दौऱ्यावर, कडेकोट बंदोबस्त तर पिशवी घेऊन जाण्यासही मनाई

नाशिक - मुखमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने आज (गुरुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येत आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री यावेळी उपस्थित राहतील. यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल हे स्वतः शहरामध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी पोलीस महानिरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत सूक्ष्म नियोजनाच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे नागरिकांना साधी पिशवी घेऊन जाण्यासही मनाई करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी आज नाशिक दौऱ्यावर, कडेकोट बंदोबस्त तर पिशवी घेऊन जाण्यासही मनाई

मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरासह जालना, सांगली, जळगाव, धुळे या जिल्ह्यातील सुमारे बारा बॉम्ब स्कॉड पथके नाशिकमध्ये दाखल झाली आहेत. नागरिकांना मोबाईल वगळता कोणतीही वस्तू सोबत बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा -राणे 'वेटिंग'वरच राहतील; गृहराज्यमंत्री दिपक केसरकरांचा टोला

तर या पथकाच्या जवानांनी सभा स्थळाचा ताबा घेतला आहे. सभा स्थळांसह सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला आहे. मोदींसह सर्व महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पडताना सुरक्षायंत्रणा दिसून येत आहे. सुरक्षेसोबत गर्दीचे नियोजन करण्यासाठी 5 हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. सभेच्या ठिकाणी मोदी यांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा दल कमांडो एसजीपी तुकडी तैनात करण्यात आली आहे. तसेच राज्य राखीव दलाची तुकडी, जलद प्रतिसाद पथकाची जवान, दंगल नियंत्रण पथक यांचा समावेश आहे.

हेही वाचा -पायाला भिंगरी बांधून बाहेर पडलोय; जे गेले त्यांना घरीच बसविणार - शरद पवार

11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय वायुसेनेच्या विमानाने ओझर विमानतळावर उतरतील. तेथून 11.50 मिनिटांनी मोदी हेलिकॉप्टरने हिरावाडी मीनाताई ठाकरे स्टेडियम येथील हेलिपॅडवर येतील. तसेच तेथून व्हीआयपी ताफ्यात अवघ्या पाच ते सात मिनिटात सभास्थळी पोहोचणार आहे.

हेही वाचा -मनसेचं अस्तित्वच धोक्यात? नेते संभ्रमात तर कार्यकर्ते कोमात!

नाशिकच्या तपोवन भागात होतं असलेल्या मोदींच्या सभेत 3 लाख नागरिक सहभागी होतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. तसेच पावसाची शक्यता लक्षात घेता वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आला आहे. कांदा पिशवीसह इतर काळ्या रंगाच्या वस्तूदेखील सभेस्थळी नेण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. कांदा प्रश्नावर शेतकरी संघटना निषेध करतील यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे.

Last Updated : Sep 19, 2019, 12:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details