नाशिक - शेतात होणाऱ्या सततच्या नुकसानीला तसेच कर्जाला कंटाळून नांदगाव तालुक्यातील नारायणगाव येथील दत्तू उगले (३०) या शेतकऱ्याने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्यावर युनियन बँकेचे तसेच वैयक्तिक कर्ज असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. एका आठवड्यातील शेतकरी आत्महत्येची ही चौथी घटना आहे.
नांदगाव तालुक्यातील नारायणगाव येथील शेतकरी किरण उगले याने आज(सोमवारी) सकाळी शेतात विजेच्या खांबाला असलेल्या टेंशन तारेला गळफास घेऊन आत्महत्या केली. किरण याचे गेल्या २ वर्षांपासून शेतीत मोठे नुकसान होत होते. तसेच त्याच्यावर युनियन बँकेचे वैयक्तिक कर्ज असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. किरण याची आत्महत्या ही जिल्ह्यातील चौथी आत्महत्या आहे. शासनाने आतातरी दुष्काळग्रस्त भागात शासकीय यंत्रणा पाठवून त्वरित पंचनामे करावे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.